रविवार, ऑगस्ट 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘कसबे सुकेणे ते ओझर एचएएल हा रेल्वे मार्ग पुर्नजिवीत करा’

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 1, 2020 | 11:14 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक – रेल्वे मंत्रालयाने नाशिक-धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात किसान रेल्वेच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर पॅकेजची’ अमलबजावणी आणि ‘अंत्योदयाची’ पायाभरणी करणेसाठी पुढाकार घेणे संदर्भात शेतकरी मित्रांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतमाल किसान रेल्वेने भारतभर जाण्यासाठी कसबे सुकेणे ते ओझर एचएएल हा रेल्वे मार्ग पुर्नजिवीत करुन ओझरला फलाट बांधावा तसेच
प्रलंबित मनमाड- मालेगाव- उमराणा- देवळा- सटाणा- पिंपळनेर -साक्री- नवापूर हा रेल्वेमार्ग ‘महारेल’ कडून कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पत्रात म्हटले की, मोदी सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान असलेली किसान रेल्वे ही योजना जाहीर केली आहे. शिवाय या किसान रेल्वेसाठी नाशिक- निफाड- कसबे सुकेणे -लासलगाव- मनमाड नांदगाव इत्यादी रेक पॉईंट दिल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव पर्यंत किसान रेल्वेची सुविधा पहिल्या टप्प्यात विस्तारली गेली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्या सोबत रेल्वेच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. त्यासाठी निम्मे अंतर असलेल्या कसबे सुकेणे ते ओझर पर्यंतची रेल्वे लाईन पुनर्जीवित करून सुरुवातीला येथून कामकाज सुरू केले तर नाशिक, दिंडोरी, निफाड तालुक्यातील शेतमाल भारतभर कमी किमतीत शेतकऱ्यांना पाठवता येणार आहे. यामुळे मोदींच्या आत्मनिर्भर योजनेला बळकटी मिळणार असून सोबत भाजीपाला भारतभर पोहोचविणाऱ्या ‘टोटल’ योजनेलाही फायदा होईल. कृषी पायाभूत सुविधा निर्माण योजनेतून प्रथम ओझर आणि नंतर पिंपळगाव पर्यंत रेल्वेची सुविधा मिळावी अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

पत्रात म्हटले आहे की, माजी खा. प्रतापदादा सोनवणे यांच्या कार्यकाळात मनमाड ते नवापूर (गुजरातच्या सीमेवर) हा नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील मध्य रेल्वेचे पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाबाबत घोषणा झाली होती, त्याचे सर्वेक्षण जाहीर झालेले होते. हा मार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात विकासाची दारे उघडी होणार आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये सुद्धा यामुळे जोडली जाणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील देवळा, सटाणा धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, साक्री आणि नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या तालुक्‍यातील शेतमाल मोठ्या प्रमाणात पश्चिम रेल्वेला जोडला जाऊन गुजरात – राजस्थान पर्यंत भाजीपाला पोचवता येणार आहे. यामध्ये विविध फळे, कांदा ,डाळिंब, द्राक्ष, टरबूज, पपई, सिताफळ इत्यादी शेतमाल कमी वाहतूक खर्चात पोचवला जाणार आहे. यामुळे प्रवासी रेल्वेसाठी ही व्यवहार्यता उपलब्ध होणार आहे. तसेच अत्यंत कमी उत्पन्न असलेल्या मानव विकास निर्देशांक आतील खालच्या स्तरावर असलेल्या बहुतांश आदिवासी बांधवांना आपल्या उन्नतीची दारे आपोआपच उघडून ते आत्मनिर्भर होतील. हा त्यांच्यासाठी आपल्याकडून अंत्योदय असेल, असे पत्रात म्हटले आहे. पत्रावर शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा, बापू पाटील, युवान फार्मर प्रोड्युसर कंपनीचे रवींद्र अमृतकर,
शरद शिंदे, सुधाकर धर्मा पाटील, दादाजी भूषण सूर्यवंशी, मोठा बोधनजी सोनवणे, अशोक माजी सोनवणे, संजय विठ्ठल सूर्यवंशी आदींची स्वाक्षरी आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’; नाशकात आढळले २२१ कोरोनाबाधित

Next Post

हाथरस- राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की,अटक व नंतर सुटका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GzFrSrPWAAAt v1
महत्त्वाच्या बातम्या

IADWS ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार…संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती

ऑगस्ट 24, 2025
Untitled 41
संमिश्र वार्ता

विशेष लेख…उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक रंगणार दक्षिण विरुद्ध दक्षिण

ऑगस्ट 24, 2025
crime1
क्राईम डायरी

दुचाकी अडवून चाकूचा वार करुन दोघांनी हॉटेल व्यावसायीकाला लुटले…नाशिकमधील भररस्त्यावरील घटना

ऑगस्ट 24, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशाने जप्त केलेली ४५.२६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता केली परत…नेमकं काय आहे प्रकरण

ऑगस्ट 24, 2025
Untitled 40
संमिश्र वार्ता

मराठी लोक भंगार है म्हणणा-या परप्रांतीयला मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप…नाशिकमधील घटना

ऑगस्ट 24, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

शिंदे यांच्या तातडीच्या निरोपानंतर नाराज तानाजी सावंत मुंबईत दाखल, दोन तास चर्चा…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी झटपट लाभाचा मार्ग तूर्तास टाळावा, जाणून घ्या, रविवार, २४ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 23, 2025
IMG 20250823 WA0414 1
स्थानिक बातम्या

‘करघा पैठणी द क्वीन ऑफ सारीज’ या चित्रपटाचे येवल्यात स्पेशल स्क्रिनिंग…मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

ऑगस्ट 23, 2025
Next Post
EjPJUyvUcAAdGPE

हाथरस- राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की,अटक व नंतर सुटका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011