शनिवार, सप्टेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कवयित्री शांताबाई यांचे बालपण नांदगाव येथे गेले….त्यांचे हस्तलिखीत पत्र, फोटो व लेख

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 12, 2020 | 5:57 am
in इतर
1
20201012 110808 1

प्रतिभासंपन्न कवयित्री शांताबाई शेळके यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने मनमाडचे प्रसिध्द फोटोग्राफर राजेंद्र गुप्ता यांनी नांदगावचे पत्रकार व माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांना शांताबाई शेळके यांच्या नांदगावच्या आठवणी शेयर केल्या. शांताबाई यांचे काही वर्षं नांदगावच्या गुप्ता कॉलोनीत वास्तव्य होते. त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र, प्रल्हाददासजी गुप्ता यांच्या बरोबरचे फोटो त्यांनी पत्रकार भास्कर कदम यांना पाठवले. त्यानंतर कदम यांनी  शांताबाई व नांदगाव असा लेख पाठवला. या सर्व आठवणी जागवणारे पत्र, लेख व फोटो वाचकांसाठी……
20201012 11060520201012 11091220201012 11070120201012 110504

शांताबाई शेळके व नांदगाव

20201012 110835

– भास्कर कदम, नांदगाव
शांताबाईंनी ‘धुळपाटी’वरील पहिली अक्षरे ‘नांदगाव’ला गिरविली ! नांदगावला शांताबाई शेळके यांचे बालपण गेले आहे. शांताबाई शेळके यांनी नांदगावच्या गुप्ता कॉलनीतील आठवणींची `धूळपाटी` आपल्या आत्मचरित्रात रंगविली आहे. याचा आम्हा नांदगावकरांना रास्त अभिमान आहे. शांताबाई म्हणतात नांदगावचे दिवस सर्वात सुखाचे होते. गुप्ता शेठने राहायला बंगल्यात जागा दिली होती. दिलेला बंगला छोटा पण सुबक होता. नांदगावला प्रल्हाद शेठ गुप्ता, पांडुरंगबाबा कवडे, विनायक पाटील हे त्यांच्या वडिलांचे घनिष्ठ मित्र होते. त्यांचे वडील नांदगावला वनाधिकारी म्हणून बदलून आले होते. गुप्ता-कवडे-पाटील या मित्रांनी शांताबाईच्या वडिलांना `नांदगावमध्येच घर घ्या, जमीन घ्या, इथेच कायमचे स्थाईक व्हा` असा सल्ला दिला होता. त्यांच्या वडिलांनाही तसे वाटू लागले होते. असे घडले असते तर महाराष्ट्रातील ख्यातनाम कवयित्री, लेखक, साहित्यिक, पत्रकार, गीतकार तथा अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा खऱ्याअर्थाने `नांदगाव`कर झाल्या असत्या. नांदगावच्या इतिहासात ते एक मानाचे पान झाले असते. परंतु त्यांचे फक्त बालपण येथे गेले. त्यांच्या साहित्यिक जीवनाला आकार येथेच मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण त्यांना या भागातील निसर्गाने, पक्षांच्या किलबिलाटाने तरल मनाला रिझविले होते, घडविले होते. असे शांताबाई शेळके यांच्या बालपणाचे आवडीचे नांदगावचे अमीट असे नाते होते. त्यांनी खऱ्याअर्थाने नांदगावमध्येच आपल्या `धुळपाटी`वरील पहिली अक्षरे गिरविली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
शांताबाई शेळके यांनी धूळपाटी या आत्मचरित्रात नांदगावच्या बालपणीच्या आठवणी विस्तृतपणे लिहिल्या आहेत. त्यांना, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नांदगावमधील माणसे मनापासून भावली होती. त्याचबरोबर  परिसर खूपच आवडला होता. इथल्या वातावरणाशी, माणसांशी ते एकरूप झाले होते. शांताबाई यांना येथील शाळेत टाकायला त्यांचे वडील घेवून गेले असता, त्यांनी रडून ओरडून शाळेत जाण्यास नकार दिला होता. त्या पळून घरी लपून बसल्या होत्या. घरी आल्यावर त्यांच्या वडिलांनी पोटभर चोप दिला होता. शांताबाई यांनी नांदगावविषयी अतिशय आत्मीयतेने लिहिले आहे. त्यांनी पुरणाचे मांडे पहिल्यांदा पांडुरंग कवडेकाका यांच्याकडे खाल्ले. इतकेच काय तर पहिले नाटक `शारदा` हे त्यांनी नांदगावीच पाहिले. शारदा नाटकाचा त्यांच्या बालमनावर खोलवर परिणाम झाला होता. त्यांना नाटकातील शारदाचे घर खरोखरचे वाटले होते. शांताबाई यांचे वडील वनखात्यात अधिकारी होते. नांदगाव परिसरात वन विभागाचे मोठे क्षेत्र आहे. त्या वेळी ते वनराईने भरलेले, पशुपक्षांनी गजबजलेले होते.
शांताबाई आपल्या धूळपाटीत नांदगाव विषयी लिहितात, नांदगावहून दादांची बदली झाली तेव्हा नांदगावच्या सर्व मित्र मंडळींना फार वाईट वाटले. आम्हालाही नांदगाव सोडून जाणे जीवावर आले होते. आमचे जायचे ठरल्यावर कित्येक दिवस गावात मेजवान्या झडत होत्या. यातीलच पहिल्या मांड्याची आठवण आहे. फुटक्या मडक्याचे बुड पालथे घालून त्यावर मांडे करणारी बाई ते भाजीत होती. आत पुरण भरलेली लहानशी लाटी घेवून ती हातावरच भराभर तिचा मोठा विस्तार करी आणि तो मांडा ती मोठ्या सफाईने मडक्याच्या बुडावर घाली. ते खमंग आणि खुसखुशीत मांडे दुधा तुपाशी खातांना झालेला आनंद आणि वाटलेले नवल अजूनही आठवते. अशाप्रकारे शांताबाई शेवटपर्यंत नांदगावला विसरल्या नाहीत.
शांताबाई शेळके यांचे जितके प्रेम नांदगावकरांवर होते, त्याहून अधिकचा अभिमान आम्हा नांदगावकरांना त्यांचा आहे. कारण कुठल्याही कळसापेक्षा पाया भरणी मजबूत असावी लागते, ती मुख्य भूमिका नांदगावची होती. ते शांताबाई यांनी स्वतः मान्य केल्याने त्याचे महत्व अधिक आहे. शांताबाईंनी लता मंगेशकर यांनाही नांदगाव विषयी कल्पना दिली होती. लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचेही वास्तव्य काहीकाळ नांदगावच्या याच गुप्ता कॉलनीत होते. नटसम्राट दत्ता भट हे सुद्धा गुप्ता कॉलनीत काहीकाळ वास्तव्यास होते. नांदगावचा भूतकाळ अत्यंत वैभवशाली होता. निसर्गाने भरभरुन दिले, पाणी मुबलक होते. माणसंही फारशी  कोत्या मनाची नव्हती. नांदगावचे गतवैभव वेगवेगळ्या निमित्त-कारणाने थोडेथोडे नव्या पिढीसमोर ठेवीत आहे. नांदगावच्या विकासाची, वैभवाची भूक मोठी आहे. ‘भूखा फकीर पिछली कंदुरी याद करता है’ अशी काहीशी सध्याची अवस्था आहे.

शांताबाई यांचे लेखन साहित्य, अजरामर गीते यामुळे त्यांचे त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला. चाळीस वर्षापूर्वी नांदगाव महाविद्यालयाने त्यांना स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी त्यांनी या सर्व बालपणीच्या आठवणी जागवल्या. त्यावेळी त्यांच्याहस्ते मला पारितोषिक स्वीकारताना मोठा अभिमान वाटला. आजही हे अप्रूप माझ्या मनात कायम आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अक्षर कविता – वंदना गांगुर्डे यांच्या `नार मी गुलजार` लावणीचे अक्षरचित्र

Next Post

मुंबईत अनेक वर्षांनी वीजपुरवठा खंडित; चौकशीचे आदेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
cidco1 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

या कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला..इतक्या कामगारांना मिळाले १० लाखाचे धनादेश

सप्टेंबर 20, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांच्या १३०० स्मृतिचिन्हे ई-लिलावात नाशिक मधील श्री काळाराम मंदिरातील चांदीचा राम दरबार…या संकेतस्थळावर द्या भेट

सप्टेंबर 20, 2025
G1Ovmg XYAAE7vR e1758332093239
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताचा सलग तिसरा विजय….ओमानला २१ धावांनी केले पराभूत

सप्टेंबर 20, 2025
ladki bahin 750x375 1
राज्य

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू….

सप्टेंबर 20, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

मोठा निर्णय….अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवानाच होणार निलंबित

सप्टेंबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील, जाणून घ्या, शनिवार, २० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 19, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मंत्री समिती गठीत…या सात मंत्र्यांचा समावेश

सप्टेंबर 19, 2025
Next Post
jo

मुंबईत अनेक वर्षांनी वीजपुरवठा खंडित; चौकशीचे आदेश

Comments 1

  1. रवींद्र मालुंजकर says:
    5 वर्षे ago

    शांताबाई आणि नांदगावच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या मान्यवरांचे आभार… नांदगाव माझे आजोळ असल्याचा मलाही सार्थ अभिमान वाटतो….
    -रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर,९४२३०९०५२६

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011