मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

 कळवण – कांदा निर्यात खुली करावी, शेतकरी संघटना व कांदा उत्पादक यांची मागणी

by Gautam Sancheti
डिसेंबर 4, 2020 | 1:46 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201204 WA0025 1

कळवण – बाजार समित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक वाढत असल्याने कांद्याच्या भावात घसरण होत आहे. उन्हाळ कांदा सरासरी १७५० तर लाल कांदा  रुपये प्रति क्विंटलप्रमाणे विक्री होत आहे . केंद्र सरकारने निर्यात खुली केली नाही तर दरातील ही घसरण सुरुच रहाणार आहे . त्यामुळे दर स्थिर ठेवण्यासाठी कांदा  निर्यात खुली करण्याची मागणी कळवण तालुका शेतकरी संघटना व कांदा उत्पादक संघटना यांनी केली असून याबाबत नायब तहसीलदार डॉ व्यंकटेश तृप्ते यांना निवेदन दिले आहे.
राज्य कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार डॉ तृप्ते यांची भेट घेऊन निवेदन दिले.
     १४ सप्टेंबर २०२०  रोजी केंद्र शासनाने अचानकपणे कांदा निर्यात बंदी ही जाहीर करुन शेतकऱ्यांच्या मुळावरच घाव घालण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. ही कांदा निर्यात बंदी शेतकरी हिताच्या दृष्टीने घातक आहे.तसेच कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातच कांदा आज रोजी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.तसेच छोट्या मोठ्या शेतकरी वर्गाकडे थोड्या प्रमाणात कांदा उपलब्ध आहे. वातावरण बदलामुळे कांदा चाळीतच मोठ्या प्रमाणात सडुन नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी अस्मानी अशा सुल्तानी संकटात सापडला असतांना त्यातच ही कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकरी वर्गात तीव्र अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा सर्व कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकरी हिताच्या दृष्टीने पुर्णत : चुकीचा घेतला गेला असुन कांद्यावरिल निर्यात बंदी ही केंद्र शासनाने लवकरात लवकर उठवावी व कांदा निर्यात खुली करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करुन परदेशी कांद्याची आयात करून कांद्यावर एकापाठोपाठ एक निर्बध घातले त्यामुळे कांद्याचे बाजार भाव घसरून कांदा उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असून आता कांद्याचे दर प्रति क्विंटलला सरासरी २ हजार रुपयापेक्षाही कमी झाल्याने केंद्र सरकारने परदेशी कांदा आयात करणे १०० टक्के बंद करून कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी आणि राज्यातील कांदा उत्पादकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्यभर रेल रोको , रास्ता रोको आंदोलन केले जाईल याची शासनाने नोंद घ्यावी असा इशारा राज्य कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष ओंकार पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, विनोद खैरनार, योगेश पगार, प्रल्हाद गुंजाळ, युवराज वाघ, राजेश शिरसाठ, विजय पाटील, रामा पाटील, दादाजी जाधव, किशोर पवार, तुषार पाटील, मुन्ना आहेर, अमित पवार, शरद आहेर, पवन रौंदळ, संजय रौंदळ, रामदास आहेर, योगेश पाटील, दिलीप शेवाळे, रमेश बच्छाव, दादा जाधव आदी उपस्थित होते.
शेती व्यवसाय अडचणीत सापडण्याची भिती
सध्या भाजीपाल्याला दर मिळत नसून इतर नगदी पिकांचीही अशी स्थिती राहिली तर शेती व्यवसाय हा अडचणीत सापडण्याची भिती शेतकऱ्यांना भेडसावत आहे .राज्यात सध्या लाल कांद्याचे उत्पादन होत असून त्याची आवक वाढली आहे . दर वाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची साठवणूक करुन ठेवली होती. परंतु , त्याची साठवण क्षमता संपत आली असून तो खराब होण्यास सुरुवात झाल्याने अनेकांनी तो विक्रीला आणण्यास सुरुवात केली आहे . मागणीच्या तुलनेत पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्येही नवीन कांदा बाजारात दाखल होत असल्याने दरात घसरण होत आहे .
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मद्य तस्करीचा संबध नगरच्या दिशेने, मोठ्या साखर कारखान्याची होणार तपासणी

Next Post

सिन्नर – मुसळगाव एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीवर छापा, बनावट किटकनाशक जप्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201204 WA0015 1

सिन्नर - मुसळगाव एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीवर छापा, बनावट किटकनाशक जप्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना धनलाभाचे संकेत मिळतील, जाणून घ्या, बुधवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 5, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओपदी या अधिका-याची नियुक्ती

ऑगस्ट 5, 2025
Screenshot 20250805 190544 WhatsApp 1

नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा

ऑगस्ट 5, 2025
IMG 20250805 WA0276 1

आंदोलनानंतर फुटलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू होणार

ऑगस्ट 5, 2025
Rorr EZ Sigma Electric Red I 16 9

ओबेन इलेक्ट्रिकने नेक्स्ट-जेन रॉर ईझी सिग्मा लाँच केली…या तारखेपासून डिलिव्हरीला सुरुवात

ऑगस्ट 5, 2025
fir111

गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगार, व्यावसायीकास पडले चांगलेच महागात…गुन्हा दाखल

ऑगस्ट 5, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011