नवी दिल्ली : नोकरी असो की कोणताही व्यवसाय आपल्याला बँकेत खाते उघडावेच लागते. काही जणांचे एकापेक्षा जास्त बँकेत खाते असते. तसेच काहींना कंपनी बदलल्यानंतर बर्याच वेळा नवीन बँक खाते उघडावे लागते. त्यानंतर काही महिने पगार नसलेल्या पूर्वीच्या खात्यात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे, परंतु बर्याच वेळा ते शक्य नसते. त्यामुळे जर खात्यात किमान शिल्लक नसेल तर खाते बंद केले पाहिजे.