रविवार, ऑगस्ट 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उद्योग व पर्यटनाच्या वाढीसाठी विमानसेवा उपयुक्त ठरेल – भुजबळ

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 20, 2020 | 10:49 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201120 WA0011 1

नाशिक – नाशिक येथून आजपासून सुरु झालेल्या बंगरूळ व हैदराबाद विमान सेवेमुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. तसेच देशातील महत्त्वाची शहरे या विमानसेवेमुळे जोडली जाणार असल्याने उद्योग व पर्यटनाच्या वाढीसाठी बंगरुळ व हैदराबाद सुरू झालेली विमानसेवा खूप उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

ओझर विमानतळावरून आजपासून सुरू झालेल्या स्पाईस जेट विमानसेवेच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, प्रांताधिकारी संदीप आहेर, मिग कॉम्प्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीएच. वी. शेषगिरी राव, एचएएलचे जनरल मॅनेजर दीपक सिंगल, साकेत चतुर्वेदी, निमाच्या हवाई वाहतूक विभागाचे मनिष रावल आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री  भुजबळ म्हणाले, आजपासून विमानसेवेच्या माध्यमातून बंगरूळ व हैदराबाद ही शहरे नाशिक जिल्ह्याला जोडली गेली आहेत, या गोष्टीचा आनंद होत आहे. याचप्रमाणे यापुढेही दिल्ली, अहमदाबाद तसेच इतरही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा नाशिक येथून सुरू होणार आहेत. उद्योजकांना त्यांच्या उद्योगांच्या वाढीसाठी वाहतुकीच्या सोयी सुविधा असणे आवश्यक असते. याअनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील उद्योजक दुसऱ्या राज्यात जाऊन परराज्यातील तसेच परदेशातील उद्योजकांना देखील आपल्या जिल्ह्यात त्यांचे उद्योग व्यवसाय वाढून रोजगार निर्मीती होण्यास देखील मदत होणार आहे. विमानसेवांमुळे जिल्ह्यातील उद्योग व पर्यटन व्यवसाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाऊन त्यांची वाढ होण्यासाठी चालना मिळणार आहे. मुंबईला जाण्यासाठी चौपदरी रस्ता व उड्डाणपुल असल्याने नाशिकहून मुंबईला काही तासातच पोहचता येत असल्याने नाशिक मुंबई प्रवास करणारे प्रवासी याठीकाणी कमी आहेत. आजपासून सुरू झालेली ही विमानसेवा सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

IMG 20201120 WA0009 1 1
पुढे बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक येथे उद्योग, शिक्षण, पर्यटनासाठी लोकांना विमानसेवेमुळे येणे सहज शक्य होणार आहे. याचसोबत नाशिक येथील शेती उत्पादनाला देखील देश विदेशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचा लाभ सर्वांना होणार असल्याने येत्या काही वर्षातच इतर विमानतळांप्रमाणेच नाशिकहून देशात व परदेशात जाण्यासाठी विमानसेवा सुरू होतील. आणि या विमान सेवांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

दिवाळीचा सण व थंडीचे हवामान या वातावरणाचा विपरीत परिणाम म्हणून कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असून काही ठिकाणी रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी याकाळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच कोरोनाचा वाढणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याचा विपरीत परिणाम या विमान सेवांवर होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपल्या जिल्ह्यातून विमानसेवा सुरू होण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. नाशिकमधून सुरू झालेल्या सर्व विमानसेवांचा समावेश उडाण योजनेअंतर्ग करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असाही विश्वास मंत्री भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डिझेल ऐवजी आता ‘एलएनजी’वर चालणार ट्रक

Next Post

मुंबईतल्या शाळा ‘३१ डिसेंबर’ पर्यंत बंदच

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
shala

मुंबईतल्या शाळा '३१ डिसेंबर' पर्यंत बंदच

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 3, 2025
unnamed 6

नाशिक जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात…विरल आणि अन्यना यांची उत्तम कामगिरी

ऑगस्ट 3, 2025
crime 12

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

ऑगस्ट 3, 2025
image0037LA4 e1754183811326

जळगावात जमले भारताचे भावी बुद्धिबळपटू: ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

ऑगस्ट 3, 2025
IMG 20250802 WA0467 e1754183550323

मठाच्या माधुरी हत्तीणी स्थलांतराबाबत वनताराने केली आपली भूमिका स्पष्ट….

ऑगस्ट 3, 2025
3 1024x683 1

दीडशे दिवस उपक्रमात होणार अनुकंपाच्या सर्व पदांची भरती…अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार आरडीसी

ऑगस्ट 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011