शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – वलयांकित – काश्मीरच्या इतिहासाचे साक्षीदार डॉ. करणसिंग

मार्च 16, 2021 | 8:46 am
in इतर
0
EwCV9CRUYAMpDH1

काश्मीरच्या इतिहासाचे साक्षीदार डॉ. करणसिंग

अतिशय प्रसन्न व देखणे व्यक्तिमत्व, मृदु आणि विद्वतापूर्ण संभाषण आणि देशाच्या राजकारणात तब्बल सात दशके सातत्याने असलेला वावर अशी अनेक वैशिष्ट्ये असणारे काश्मीरचे राजपुत्र आणि पहिले सदर-ए-रियासत डॉ. करणसिंग यांनी नुकतीच वयाची नव्वदी गाठली. काश्मीर हा सगळ्याच भारतीयांच्या दृष्टीने एक विलक्षण जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयातल्या सगळ्या घडामोडींचे केवळ साक्षीदारच नव्हे तर त्यात सहभागी असणारे महत्वाचे घटक म्हणून आज करणसिंग ह्यांचेच नाव घ्यावे लागेल.
दिलीप फडके
प्रा. दिलीप फडके
(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत)
ई मेल – [email protected]
काश्मीरचे शेवटचे डोग्रा राजे महाराजा हरीसिंग यांचे एकुलते एक चिरंजीव असणाऱ्या करणसिंग  यांचे सगळे जीवन विलक्षण नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. त्यांचा जन्म फ्रान्समधील कॅन्स इथला. शिक्षण त्या काळातल्या उच्च वर्गीयांच्या डून स्कूलमध्ये झाले. त्यानंतर प्रथम बी.ए. जम्मू-काश्मीर युनिव्हर्सिटी, श्रीनगर येथून पदवी आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समध्ये एम.ए. चे शिक्षण घेतले.
काश्मीर सारख्या संवेदनाशील राज्याचे राजपुत्र असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात करणसिंग यांच्यावर अनेक बंधने येणे सहाजिकच होते. त्यांचे बहुतेक शिक्षण घरी येणाऱ्या शिक्षकांकडूनच झाले. इतर सामान्य मुलांप्रमाणे वर्गातल्या मित्रमंडळींमध्ये खेळणं वगैरे हे सामान्य आयुष्य त्यांच्या वाट्याला आले नाही.
करणसिंग  अवघे सोळा वर्षाचे असतांना भारताला स्वातंत्र्य मिळाले. काश्मीर स्वतंत्र रहावे अशी महाराजा हरीसिंग यांची इच्छा होती पण त्यावेळी जनपरिषदेचे नेते आणि काश्मीरच्या लोकांचे नेते शेख अब्दुल्ला यांना भारतात यायचे होते. पाकिस्तानने पाठवलेले सशस्त्र बंडवाले श्रीनगरच्या वेशीवर पोहोचले त्यावेळी  हरीसिंगांनी भारताशी विलिनीकरणाचा करार केला.
महाराजा हरीसिंग पायउतार झाले आणि सोळा सतरा वर्षाचे करणसिंग  यांनी काश्मीरच्या घटनात्मक प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली. ते सदर-ए-रियासत झाले. शेख अब्दुल्ला यांच्याकडे सत्तेची खरी सूत्रे आली. एका अर्थाने ते एक शापित राजपुत्रच ठरले. त्यानंतरच्या सात दशकात अगदी अलीकडच्या  ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत अनेक स्थित्यंतरे आली.

EwFXruAUYAAOqX2

करणसिंग  हे ह्यासगळ्या बदलांचे साक्षीदार आहेत. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेत ते नेहमीच सहभागी होते किंवा त्यांची ह्या सगळ्यात काही महत्त्वाची भूमिका होती असे नाही. पण ह्या घडामोडी त्यांच्या डोळ्यासमोर घडल्या आहेत.
१९५२ पर्यंत ते जम्मू-काश्मीरचे प्रिन्स एजंट होते. त्यानंतर २१ व्या वर्षी करणसिंग यांनी १९६५ पर्यंत जम्मू-काश्मीर राज्याचे पहिले प्रमुख म्हणून काम केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किशोरवयीन करणसिंग  यांना जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली होती. पुढे १९६७ मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला आणि त्यावेळी ते सरकारमधील सर्वात कमी वयाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री झाले.
पर्यटन आणि नागरी विमान उड्डाण, तसेच कुटुंब कल्याण अशा खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांची नसबंदीची मोहिम करणसिंग यांच्या खात्याशी संबंधित होती. ती मोहिम प्रचंड बदनाम झाली पण त्या वादळात करणसिंग  आपल्या ऋजु स्वभावामुळे लोकक्षोभापासून दूर राहिले होते.
अनेक वर्षे ते संसदेच्या दोन्ही सभागृहांचे – कधी लोकसभेचे तर कधी राज्यसभेचे सदस्य होते. इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या कामाशी ते जवळून संबंधित आहेत . ते त्या संस्थेचे आजीवन सदस्य तर आहेतच पण अनेक वर्षे त्यांनी त्याचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे.
बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केलेले आहे. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि एनआयआयटी विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय अमेरिकेतले भारताचे राजदूत म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे. विशेषतः रशिया-अमेरिकेमधले शीतयुद्ध  अगदी बहरात असतांना त्यांनी भारताची बाजू अमेरिकन सरकारसमोर यशस्वीपणे ठेवण्याचे कठीण काम सहजपणाने केले होते.

EwVMkkjUYAI4yu7

खरं तर जवळपास सगळ्या आयुष्यभर ते कॉँग्रेसशी संबंधित राहिले . कॉँग्रेसचे सदस्य म्हणून त्यांनी संसदेत आणि मंत्रिमंडळात अनेक पदे भूषविली. पण त्याच वेळी विश्व हिंदू परिषदेसारख्या हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्या संस्थेशी देखील ते जोडले गेले होते.
१९८१ च्या मीनाक्षीपुरमच्या धर्मांतराच्या घटनेनंतर भरवलेल्या विराट हिंदू संमेलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला होता. पंजाबमध्ये शीख अतिरेक्यांकडून हिंदूंच्यावर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात त्यांनी जोरदार मोहिम राबवली होती १९८४ साली त्याविषयावर न्यूयॉर्क इथे झालेल्या परिषदेचे मुख्य भाषण करणसिंग यांनी केले होते.
विश्व हिंदू परिषदेच्या अखंड भारत ह्या संकल्पनेला त्यांचा उघड पाठिंबा आहे. जम्मूला राज्याच्या सत्तेमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे हे ते सातत्याने सांगतात. आपण  काश्मिरी नसून डोग्रा आहोत असे ते उघडपणे सांगतात पण तरीही काश्मीरच्या लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हेदेखील ते मान्य करतात. सध्याच्या सरकारने काश्मीरच्या संदर्भात घेतलेले सगळेच निर्णय त्यांना मान्य आहेत असे नाही पण त्यांचा परिणाम काय होतो ते पाहण्यासाठी आपण सर्वांनीच संयमाने काही काळ वाट पहिली पाहिजे असे ते सांगतात.
वयाची नव्वदी पार करणारा भारतातल्या एका महत्त्वाच्या राजघराण्याचा प्रतिनिधी म्हणून करणसिंग  यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. ह्या राजपुत्राने इतिहासाचा एक प्रदीर्घ काळ प्रत्यक्ष घडतांना खूप जवळून बघितलेला आहे.. त्यात कशी का असेन एक प्रकारची भूमिका वठवलेली आहे. त्यामुळे आजच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात करणसिंग  यांचे एक वेगळे स्थान आहे हे नक्की.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोनू सूद देणार १ लाख नोकऱ्या; तुम्हालाही हवी आहे का?

Next Post

रेमडेसिव्हिर इंजेक्शन १२०० रुपयांना हवंय? त्वरित या नंबरला फोन करा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
remdesivir

रेमडेसिव्हिर इंजेक्शन १२०० रुपयांना हवंय? त्वरित या नंबरला फोन करा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011