मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – मुक्तांगण – ‘माऊली’ची खटपट

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 10, 2020 | 1:08 am
in इतर
0
IMG 20201109 WA0019

समृध्द शेती अन् सुदृढ समाजासाठी ‘माऊली’ ची खटपट

कोरोना महामारीच्या काळात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जितक्या घटकांचे समाजासाठी विशेष योगदान राहिले. त्यामध्ये शेतकरी या घटकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आपत्कालीन परिस्थितीतही समाजाचा अन्नदाता बनणाऱ्या या बळीराजासाठी काहीतरी करावे, अशा धडपडीतून राजकुमार गोपालराम यादव यांनी माऊली प्रा.लि. कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या या कंपनीच्या उत्पादनांना विविध जिल्ह्यांसह परराज्यांमधूनदेखील मागणी वाढते आहे. त्यांची ही यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे….
IMG 20190511 WA0001
संतोष साबळे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
शेतीमध्ये वाढलेला रसायनांचा वापर आणि त्याचे जमिन व कृषीमालाच्या उत्पादनावर दिसून येणारे अनेक प्रतिकूल परिणाम पाहता अलिकडे सेंद्रीय शेतीवर अनेक जण भर देताहेत. शेती विषयातील आवडीमुळे राजकुमार गोपालराम यादव या तरूणानेही वाणिज्य शाखेतील पदवीनंतर इतर नोकरी-व्यवसायाच्या मागे न लागता कृषीसेवेत स्वत:स झोकून देण्याचा संकल्प केला. त्यासाठी गरज होती ती कृषी विषयक शिक्षणाची. यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कृषी पदवीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेत शेती अन् मातीतले प्रश्न समजून घेण्यास सुरूवात केली. शेतीच्या बहुतांश प्रश्नांचे उत्तर राजकुमार यांना सेंद्रीय शेती पध्दतीत सापडत गेले. या प्रयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी याच व्यवसायात उतरलो तर छंदाचे रूपांतर व्यवसायात होऊन योग्य समन्वय साधला जाईल, या अपेक्षेने त्यांनी ‘माऊली प्रा.लि.’ या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.
रासायनिक खतांचा वाढता उपयोग, परिणामी दिवसेंदिवस खालावत जाणारी जमिनीची प्रत, रसायनांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल अशा प्रमुख समस्यांवर आपली सेवा काय उपाय देऊ शकते , हा विचार यादव यांच्या मनात वारंवार येत होता. यावर पूर्वमशागतीपासून तर पिक काढणीपर्यंत आवश्यक त्या सर्व प्रकारची सेंद्रीय-जैविक औषधे एकाच ठिकाणी माऊली कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. पण केवळ व्यवसायास सुरूवात करून विक्री वाढविणे इतके मर्यादित आव्हान या विषयात नव्हते. पूर्णत: जैविक औषधांच्या विक्री व्यवसायात पडण्यापेक्षाही सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे मोठे आव्हान या सुरूवातीच्या टप्प्यात राजकुमार यांच्या समोर उभे होते.
कारण, या व्यवसायातील स्पर्धा, भांडवल उभारणीसोबतच शेतकऱ्यांची मानसिकता, रासायनीक शेतीचा असणारा पगडा, जैविक औषधांबाबतचे गैरसमज, अपूर्ण माहिती या वस्तूस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये या विषयाबाबत जनजागृती करण्याची गरज विषेशत: जाणवली. परिणामी , सुरूवातीच्या काळात उपलब्ध भांडवलात छोट्या प्रमाणावर जैविक औषधांची खरेदी करून गावोगावी-खेडोपाठी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.
IMG 20201109 WA0018 1 e1604937228440
विविध हंगामात पिकांवर येणाऱ्या संभाव्य रोग-किडी, पिक संरक्षणार्थ उपाय योजना आदी माहिती देऊन जैविक औषधांची विक्री करण्यावर भर दिला. या शेतकरी जागरामुळे अनेकांनी उत्पादनांमध्ये वाढ झाल्याचा सकारात्मक अनुभवदेखील अनेकांना आला. यामुळे नकळत बहुसंख्य शेतकरी आमच्याशी नंतरच्या काळात जोडले गेले. ‘समृध्द शेती’, ‘शेतकऱ्यांचे समाधान’ आणि ‘पर्यावरण रक्षण’ या त्रिसूत्रीवर भर देत सुरू झालेल्या माऊली ऑरगॅनिक प्रा. लि. च्या आज दिंडोरीसह कळवण, सटाणा, गिरणारा या ठिकाणी शाखा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे ३५ डिलर्सदेखील माऊली कंपनीशी जोडले गेले आहेत. आता जिल्ह्यासह परराज्यांमधूनदेखील उत्पादनांना मागणी वाढते आहे. प्रामुख्याने गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेशातील शेतकरी व डीलर्स या मागणी-पुरवठा साखळीत जोडले जात आहेत. भविष्यामध्ये जिल्हा व राज्यासह देशभरात शाखा सुरू करण्याचा मानस आहे.
कृषी क्षेत्रातील भविष्यातली विविध आव्हाने बघता जमिनीची सुपिकता वाढविणे हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. यामुळे ‘ॲझेटोबॅक्टर’, ‘ॲझोस्पीरिलीयम’, ‘रायझोबियम’, ‘स्फुरदाचे जीवाणू’, ‘पलाश विरघळविणारे जीवाणू’, ‘जैविक बुरशी नाशके’ आदी निविष्ठा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महत्वाची बाब म्हणजे माऊली ऑरगॅनिक प्रा. लि. मधील सर्व निविष्ठांचा उपयोग प्रथमत: संचालक स्वत:च्या नियंत्रणाखाली व स्वत:च्या शेतावर करतात. या प्रयोगाची परिणामकारकता अभ्यासल्यानंतरच त्यांच्याकडून शिफारस केली जात असल्याने हा सल्ला फायदेशीरदेखील ठरतो. शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन देखील विनामूल्य मार्गदर्शन केले जाते.
वंचित घटकांना ज्या प्रकारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून बळ देऊ केले, त्याप्रमाणे कृषी मार्गदर्शनातही विद्यापीठाच्या योगदानाची बरोबरी सहजासहजी कुणी करू शकत नाही. कृषी विज्ञान केंद्राच्या स्थापनेसोबतच अनेक शेतरकऱ्यांना कृषीसाक्षर करण्यातही विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. विद्यापीठाच्या प्रेरणेने या व्यवसायात प्रवेश केल्यानंतर असंख्य शेतकऱ्यांना आमच्याजवळील कृषी ज्ञानाच्या ठेव्याचा उपयोग होत असल्याचे वेगळे समाधानदेखील या व्यवसायातून प्राप्त होते. माऊली ऑरगॅनिकच्या वाटचालीचे श्रेय हे आई-वडिल, पूर्ण परिवार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, भागीदार, शेतकरी आणि डिलर्ससह सर्व हितचिंतकांना जाते.
दिवसेंदिवस शेती व्यवसायातील आव्हाने वाढत आहेत. कृषीमालाच्या बाबतीत झालेल्या ज्ञानाच्या प्रसारामुळे आता ग्राहकदेखील अतिशय जागृत झाला आहे. आरोग्याच्या रक्षणासाठी सेंद्रीय उत्पादनांकडेही ग्राहकांचा कल दिसून येतो. परिणामी, गुणवत्तापूर्ण सेंद्रीय उत्पादनांच्या मागणीचा भविष्यातील आलेख हा वाढतच जाणार आहे. जमिनीची सुरक्षितता, कृषीमालाची गुणवत्ता आणि ग्राहकहित यासारख्या मुल्यांच्या जपवणूकीसाठी सेंद्रीय शेतीला पर्याय नाही.
सेंद्रीय शेती ही शाश्वत शेती आहे, असे अनुभवाने म्हणता येईल. शाश्वत सेवेकडे वळण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीबाबतच्या मूळ संकल्पना समजून घ्याव्यात, व्यक्त होऊन मनातील शंकांचे निरसन करून घ्यावे अन् समृध्द शेती-सुदृढ समाजाच्या उभारणीसाठी योगदान देण्यासाठी पुढाकार घेण्याची ही वेळ आहे….
सदर लेखमाला
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – मुकी फुले – भाग २

Next Post

बिहार- एनडीएला सर्वाधिक जागा; मुख्यमंत्री कोण होणार?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

बिहार- एनडीएला सर्वाधिक जागा; मुख्यमंत्री कोण होणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय….

ऑगस्ट 19, 2025
Untitled 32

इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची केली घोषणा

ऑगस्ट 19, 2025
Jitendra Awhad

कीर्तनकाराने दिली बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी…जितेंद्र आव्हाड यांनी केला असा निषेध

ऑगस्ट 19, 2025
crime 71

धक्कादायक….पत्नीचा खून करुन पतीने गळफास लावून केली आत्महत्या, नाशिकच्या अंबड येथील घटना

ऑगस्ट 19, 2025
accident 11

भरधाव आयशर ट्रकची कारला धडक…अपघाताचा जाब विचारल्याने कारचालकास जीवे ठार मारण्याची धमकी

ऑगस्ट 19, 2025
Gyj9FwXXMAAG8KV

विशेष लेख….एक तीर, अनेक निशाण

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011