मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण विशेष – निसर्ग रक्षणायन – अंदमानचा रक्षक

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 8, 2020 | 9:31 am
in इतर
0
फोटो - 'द हिंदू'च्या सौजन्याने

फोटो - 'द हिंदू'च्या सौजन्याने


अंदमानचा रक्षक

गेल्या महिन्यात एक व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली. ती होती समीर आचार्य. अंदमान आणि निकोबार या बेटांवरील आदिवासी जमात आणि तेथील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ते कार्यरत होते. अंदमानचे रक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याची ओळख करुन देत त्यांना केलेला हा सलाम….

For Web e1599824680409
भावेश ब्राह्मणकर
(लेखक हे पर्यावरण व सामरिकशास्त्र अभ्यासक आहेत)

अंदमान आणि निकोबार ही भारतीय महासागरात असलेली बेटे आहेत. भारत सरकारने त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आहे. आज सुद्धा ही बेटे तेथील आदिवासी बांधव आणि निसर्गरम्य (खरं तर स्वर्गच) वातावरणामुळे जगप्रसिद्ध आहेत. पर्यटनासाठी अनेकांची पावले या बेटांकडे वळतात. या बेटांवरील पर्यटनाबाबत आजवर मोठे लिखाण झाले आहे. किंबहुना त्याची त्यासाठीच चर्चा होते. मात्र, या बेटाचे महत्त्व केवळ तेवढ्यापुरता मर्यादित नाही. पर्यावरण, निसर्ग, सामरिकदृष्ट्या या बेटांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा म्हणूनही अनेकांना ही बेटे माहित आहेत. तेथील तुरुंग पाहण्यासाठी आणि सावरकरांनी भोगलेल्या यातना जाणून घेण्यासाठीही अनेक जण अंदमानला जातात. ब्रिटिशांनी या बेटांचे महत्त्व कैद्यांना ठेवण्यासाठीच केले. मात्र, या बेटावरील निसर्ग सौंदर्य हे अदभूतच आहे. तेथे जाऊन येणारा प्रत्येक पर्यटक तेच सांगतो. अनेक जण त्याचे फोटो सोशल मिडियावर टाकून अनेकांनाही येथे येण्यासाठी प्रेरित करतात. आम्ही स्वर्गातच जाऊन आलो किंवा स्वर्गच अनुभवला अशा प्रतिक्रीया ऐकून बहुतांश जणांना ही बेटे खुणावतात.त्यामुळे वर्षाकाठी तेथे पर्यटकांची मोठी मांदियाळी तेथे जमते. गेल्या महिन्यातील एका घटनेने या बेटांकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे.

andman

अंदमान व निकोबार बेटावर राहणाऱ्या समीर आचार्य यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्रातील मोठे व्यक्तीमत्व लोप पावले आहे. आचार्य यांनी या बेटावरील जरावा या आदिवासी जमातीसाठीही मोठे योगदान दिले. गेल्या तीन ते चार दशकांपासून चाललेले त्यांचे कार्यही अतिशय लख्खपणे सर्वांसमोर आले आहे. अंदमान व निकोबार हा द्विपसमूह हा निसर्गाची मोठी खाण आहे. ती आपण जपली पाहिजे. ती अतिशय मोलाची संपत्ती आहे. मात्र हे मूल्य जाणले जात नसल्याने त्यांनी मोठा लढा उभारला होता.

२००२ मध्ये पोर्ट ब्लेअर येथे एका रस्त्याच्या कामाचा घाट घालण्यात आला. हा रस्ता असंख्य झाडांवर कुऱ्हाड पाडणारा होता. तसेच, यामुळे तेथील जैविक विविधताही नष्ट होणार होती. म्हणूनच त्यांनी या रस्त्याचा हा प्रस्ताव हाणून पाडण्यासाठी अनेक पातळ्यांवर लढा दिला. अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत साऱ्यांनाच विनंती केली. पण, काहीच झाले नाही. अखेर त्यांच्यातील पर्यावरण कार्यकर्त्याने अखेर थेट सर्वोच्च न्यायालय गाठले. तेथे त्यांनी सविस्तर मुद्दे मांडले आणि रस्त्याला कडाडून विरोध केला. अखेर न्यायालयाने त्याची योग्य दखल घेतली आणि रस्ता न बनविण्याचा निर्णय दिला. हा निकाल शिरसावंद मानत रस्ता बारगळला. हा केवळ एकच लढा झाला. पण अंदमान-निकोबार बेटावरील मासेमारी असो की अन्य प्रश्न या प्रत्येक बाबतीत ते अतिशय आग्रही होते. पर्यावरणाचे नुकसान करुन आपण तात्पुरते काही हशील करु पाहत आहोत पण ते चिरकाल टिकणार नाही. उलट पर्यावरण सांभाळले तर आपल्याला अनेक वर्षे संकटांना तोंड द्यावे लागणार नाही.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी असो की अन्य पर्यावरण संघटना या सर्वांबरोबरच ते काम करायचे. या बेटावरील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जैविक विविधतेमुळे तेथे अभ्यासाबरोबरच अन्य ‘उद्योग’ करायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ते अधिक सजग असायचे. संबंधितांना पारखून घेतल्यानंतरच ते त्यांना तेथे काम करण्यास मदत करत. वने, जैवविविधता ही अतिश अनमोल आहे. ती एकदा नष्ट झाली तर आपण कितीही ठरविले तरी ती पुन्हा निर्माण होणार नाही. शेकडो वर्षांपासून नांदणारी ही जैविक सृष्टी आपण का म्हणून धोक्यात आणायची, असा प्रश्न ते सर्वांनाच विचारायचे.

पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत ते आग्रही होते. त्यामुळेच तेथील प्रशासनाने दाद दिली नाही तर शेकडो किलोमीटर अंतरावरील भारतात येऊन आणि संबंधितांना भेटून ते त्यांचे मुद्दे परखडपणे मांडत. मग ते न्यायालय असो, सरकार, प्रशासन की अन्य कुणी. त्यांच्या या अथक कार्यानेच तेथील जैविक विविधता सध्या सकुशल आहे. २००४ मधील त्सुनामीची घटना जगप्रसिद्ध आहे. या त्सुनामीने या बेटांवरही होत्याचे नव्हते केले. मात्र, याच घटनेबाबत आचार्य यांचे अनुभव अतिशय मोलाचे होते. वन्यप्राणी आणि जैवविविधतेचे अत्यल्प झालेले नुकसान तसेच अन्य बाबी ते अगदी चपखलपणे सर्वांना सांगायचे. त्यामुळेच भारतीय सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अनेकांची पावले त्यांच्या घराकडे वळायची. पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला.

जरावा या आदिवासी जमातीसाठी त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांचे हक्क असोत की त्यांच्या अस्तित्वावरील आव्हाने परतावून लावणे असो त्यांनी प्रत्येकवेळी कणखरपणे किल्ला लढविला. हे आदिवासी बांधव हे पर्यावरणाच्या संरक्षणातील किती महत्त्वाचा घटक आहेत हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले. म्हणूनच आज या आदिवासी जमातीचे नांदणेही आचार्य यांच्या कार्याचे फलीत आहे. या बेटांवर संरक्षणाचे मोठे कार्य चालते. तसेच, विविध प्रकारची जहाजे या बेटावर येतात. मात्र, या सर्व बाबींमुळे पर्यावरणाचे कुठेही नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. समुद्री प्रवाळ असो की खारफुटी किंवा अन्य कुठली प्रजाती त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. अंदमानातील आदिवासी जमातीला तब्बल ६५ हजार वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. या जमातीला जपणे आणि त्यांच्या माध्यमातून तेथील पर्यावरणाची काळजी करणे असे चपखल कार्य ते करीत होते.

गेल्या महिन्यात त्यांचे निधन झाल्याने जगातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण या बेटांवरील एक तारा निखळला आहे. पर्यावरण क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक या सजीवसृष्टीवरुन गेला आहे. मात्र त्यांचे कार्य अजूनही अनेकांना प्रेरणा देत आहे. या बेटांवरील पर्यावरणाचे रक्षण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – आक्काचे लग्न – भाग ६ – बालमित्रांचे मनोगत

Next Post

अक्षर कविता – आण्णासाहेब कोठे यांच्या ‘बायका बोलतात’ या कवितेचे अक्षरचित्र

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201107 WA0001

अक्षर कविता - आण्णासाहेब कोठे यांच्या 'बायका बोलतात' या कवितेचे अक्षरचित्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
WhatsApp Image 2025 08 04 at 1.51.07 PM 1920x865 1 e1754317916454

मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा…दिले हे निर्देश

ऑगस्ट 4, 2025
anjali damaniya

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय बंगला ५ महिने खाली केला नाही…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

ऑगस्ट 4, 2025
Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011