गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण विशेष – निसर्ग रक्षणायन – वन भूजलाचा आदर्श

by India Darpan
ऑक्टोबर 31, 2020 | 1:04 am
in इतर
0
Eh9S5akU0AAGyAc

वन भूजलाचा आदर्श

छत्तीसगड राज्याने एक अभिनव प्रकल्प सध्या हाती घेतला आहे. तो म्हणजे जंगलातील भूजलाचा स्तर वाढविण्याचा. ही योजना जर यशस्वी झाली तर ती संपूर्ण देशभरातच आदर्शवत ठरणार आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या योजनेविषयी जाणून घेणे अगत्याचे आहे.

For Web e1599824680409
भावेश ब्राह्मणकर
(लेखक हे पर्यावरण व सामरिकशास्त्र अभ्यासक आहेत)

जगभरात जेवढे पाणी आहे त्यातील गोडे किती, तसेच प्रत्यक्ष जमिनीवर किती आणि जमिनीत किती याची माहिती जवळपास सर्वांनाच आहे. त्याबाबत फारसे बोलणे किंवा सांगणे योग्य नाही म्हणूनच आता थेट भूजलाच्या संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नांबाबतच बघणे आवश्यक आहे. याबाबतीत छत्तीसगड राज्याने एक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले आहे. ऑक्सिजनचे भांडार किंवा भूतलावरील फुफ्फूस म्हणून ओळख असलेल्या जंगलांकडे तसे फारसे लक्ष नसते. वन्यजीव किंवा घनदाट झाडी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. जंगल हे जैविक विविधतेचे मोठे भांडार आहे. याठिकाणी अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनसंपदा, जैविकसृष्टी नांदते. केवळ एवढ्यापुरता जंगलांचा विचार करणे योग्य नाही. मात्र, भूगर्भातील पाण्याचा स्तर वाढविण्यासाठीही जंगल महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याचा प्रामुख्याने विचार छत्तीसगड सरकारने केला आहे. म्हणूनच त्यांनी हरुवा घुरवा बारी विकास योजना आणली आहे. याद्वारे जंगलातील नाल्यांद्वारे भूजल पातळी वाढविली जाणार आहे.

खेड्यांपासून शहरांपर्यंत सर्वत्र भूजलाचा उपसा प्रचंड वाढला आहे. कारण, जमिनीवरील पाण्याची कमतरता. हवामानातील बदलांमुळे वेळी-अवेळी आणि कमी-अधिक प्रमाणात बरसणारा पाऊस जमिनीवीरल पाण्याच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम करतो. पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले तर पाण्याची शोधाशोध होणारच म्हणून गेल्या काही वर्षात विहीरी आणि बोअरचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे वारेमाप भूजलचा उपसा होत आहे. ही बाब आज नाही पण नजिकच्या आणि भविष्यासाठीही धोकादायक आहे. आगामी काळ चांगला जायचा असेल तर भूजल उत्तम असणे गरजेचे आहे. म्हणूनच मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांच्या नेतृत्वात भूजलस्तर वाढविण्यासाठी सर्वंकष असा विचार करण्यात आला आहे.

जंगलांमध्ये नैसर्गिक स्वरुपातील अनेक नाले आहेत. गेल्या काही वर्षात या नाल्यांकडे मोठे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुले पाण्याचा सक्षम असा नैसर्गिक स्त्रोत दुर्लक्षिला गेला आहे. याकडेच छत्तीसगड सरकारने लक्ष देण्याचे निश्चित केले आहे. विविध प्रकारच्या जंगलांमधील एकूण १०८९ नाल्यांची खोली वाढविणे, त्यांचे रुंदीकरण, बांध घालणे अशी विविध प्रकारची कामे या नव्या योजनेत हाती घेतली जाणार आहेत. याद्वारे तब्बल ४ लाख २८ हजार ८२७ हेक्टर क्षेत्रावरील भूजलाचे स्त्रोत सक्षम केले जाणार आहेत.

प्राथमिक स्तरावर या योजनेसाठी १६०.९५ कोटी रुपयांची तरतूद कॅम्पा (कम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन मॅनेजमेंट अँड प्रोटेक्शन अथॉरिटी) अंतर्गत करण्यात आली आहे. याद्वारे एकूण १३७ नाल्यांची बांधबंदिस्ती होणार आहे. एकूण ३१ वन विभागांमध्ये, एका राष्ट्रीय उद्यानात, दोन व्याघ्र प्रकल्प आणि एका हत्तींसाठी संरक्षित क्षेत्र आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यक्षेत्रात ही कामे केली जाणार आहेत.

पुढच्या टप्प्यात ३ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील भूजल स्त्रोतांना बळकटी दिली जाणार आहे. त्यासाठी पुन्हा १६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. २०२०-२१ या वर्षात २०९ कोटी रुपयांद्वारे अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत जो आराखडा तयार करण्यात आला आहे. तो अतिशय समर्पक असा आहे. याद्वारे इंद्रावती व्याघ्र प्रकल्पातील ५८ नाले, गुरु घासीदास राष्ट्रीय पार्कमध्ये ४२, अचनकमरव्याघ्र प्रकल्पातील २८, कंगल व्हॅली राष्ट्रीय उद्यानातील ११, उडन्ती सितानदी व्याघ्र प्रकल्पात १० आणि तामोरिपिंगळा हत्ती रिझर्व्ह मध्ये २ नाल्यांचे काम केले जाणार आहे.

कॅम्पाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून याद्वारे अपेक्षित सर्व कामे वेळेत होणार आहेत, असा विश्वास वनमंत्री मोहम्मद अकबर यांना आहे. ३१३ धरणांच्या क्षेत्रात एकूण १९९५ नाले आहेत. याद्वारे ७ लाख ४ हजार हेक्टरवरील जमिनीवर प्रत्यक्ष काम केले जाणार आहे. त्यात वळण बंधारे, छोटे बंधारे, खोलीकरण, रुंदीकरण यासह विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. वनांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी तसेच अन्य स्वरुपाचे जल या योजनांमुळे उपलब्ध होणार आहे. तसेच, या भागातील जमिनीला, शेतीला मोठा फायदा होणार आहे. वनांच्या भागात उपजिविका असणाऱ्यांनी फळे आणि भाजीपाल्याची लागवड करावी, अशी अपेक्षा सरकारला आहे. या योजनेद्वारे २० लाख मानवी दिवसांऐवढा रोजगारही निर्माण होणार आहे.

रोजगार, गुंतवणूक, जलसंधारण, सिंचन, भूजल अशा विविध प्रकारच्या पातळ्यांवर या योजनेचे मोठे परिणाम होणार आहेत. तसेच, पर्यावरणाचे सर्व नियम पाळूनच नाल्यांचे काम केले जाणार आहे. ही योजना तशी पथदर्शी आहे. त्याचे यशापयश नजिकच्या काळातच दिसणार आहे. वन्यजीवांनाही या नाल्यांचा मोठा फायदा होईल कारण त्यांना हक्काचे पाणवठेही उपलब्ध होतील. अशा प्रकारच्या अभिनव योजना आणि प्रकल्प ही आजच्या काळाची खरी गरज आहे. त्यादृष्टीने सर्वच राज्य सरकारांनी विचार करायला हवा. जंगले संरक्षित आहेत. त्यामुळे तेथील नाले आणि जलसंधारणाची कामेही संरक्षितच राहतील. त्याचा परिणाम मात्र भूजलावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. दूरदृष्टीकोनातून या योजनेचे मोल मोठे आहे.

पर्यावरणी प्रश्नांकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून बघण्याची दृष्टी विकसित करायला हवी. तसे केले तरच पर्यावरणाचे खऱ्या अर्थाने संरक्षण आणि संवर्धन होणार आहे.

सदर लेखमाला

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशीभविष्य – शनिवार – ३१ ऑक्टोबर २०२०

Next Post

श्यामची आई संस्कारमाला – भाग ६ – सावित्री व्रत – मनोगत

India Darpan

Next Post
e1603635564457

श्यामची आई संस्कारमाला - भाग ६ - सावित्री व्रत - मनोगत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011