सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – दर्पण – करो’ना’चे वर्ष!

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 27, 2020 | 1:08 am
in इतर
0

करो’ना’चे वर्ष!

 राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांच्या वर्षभराच्या कामाचे मूल्यमापन सर्वत्र केले जात आहे. पण, आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अवघ्या काही महिन्यात कोरोनाने कहर केला. त्यातच अनेक संकटांना या सरकारला सामना करावा लागला. त्यात केंद्र सरकारचा असहकार असल्यामुळे त्यांना या वर्षभरात फारसे काही वेगळे करता आलेले नाही. त्यामुळे या सरकारचे मूल्यमापन करणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. पण, तीन पक्ष एकत्र येऊन आलेल्या या सरकारमध्ये मात्र एकसंधपणा अजूनही दिसला नाही. तो आणण्यात हे सत्तेतील पक्ष कमी पडले.

gautam sancheti
गौतम संचेती
(लेखक इंडिया दर्पणचे संपादक आहेत)

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नसतांना त्यांनी वर्षभर हे पद सांभाळले. त्याबाबत वेगवेगळी मत-मतांतरे असू शकतील. पण, ते जबाबदारी पार पाडतांना एकदमच प्रशासनात नवखे वाटले नाहीत. एखाद्या संघटनेचे प्रमुखपद व मुख्यमंत्रीपद ही दोन्ही पदे वेगवेगळी आहेत. अवाका मोठा आहे. त्यामुळे त्यांनी ते त्यांच्या स्टाइलने सांभाळले. कोरोनाकाळात तर त्यांच्या संयमाचे अनेकांनी कौतुक केले. तर विरोधी पक्षांनी जोरदार टीकाही केली. कंगना राणावत, अर्णब गोस्वामी यांच्याशी संबधित प्रकरणे सरकारला देशभरात बदनाम करुन गेली. तर दुसरीकडे या प्रकरणामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारला सहानुभूती मिळाली.

जो तो महाविकास आघाडी सरकारचे मुल्यमापन करेल. पण, या सरकारमुळे स्थानिक पातळीवर काय स्थिती आहे हे सुद्धा बघणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यातून वेगवेगळ्या पक्षाचे १५ आमदार निवडून आले आहेत. त्यात ६ राष्ट्रवादी, ५ भाजप, २ शिवेसना, काँग्रेस व एमआयएम प्रत्येकी एक आहे. त्यात १५ पैकी तीन पक्षाचे नऊ आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. सत्तेत असलेल्या बहुतांश आमदारांना वर्षभरात फार भरीव असे काही करता आलेले नाही. पण, आपण सत्तेत आहोत याचा आनंदही त्यांना फारसा घेता आला नाही. कारण ज्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्याचाही पक्ष सत्तेत आल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. जिल्ह्यातील येवला, निफाड, दिंडोरी, सिन्नर व देवळाली येथे तर राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तर नांदगावमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा. येथे दुसरा पक्ष फारसा सक्षम नाही. त्यामुळे या मतदारसंघात ही अडचण मोठी आहे. इगतपुरीमध्ये एकमेव काँग्रेस उमेदवार निवडून आले असले तरी पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचा आहे. मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेनेने यश मिळवले तरी पराभूत उमेदवार काँग्रेसचा आहे. त्यामुळे या प्रमुख मतदारसंघात राजकीय वातावरण आजही फारसे चांगले नाही. भविष्यात येणा-या निवडणुकांमध्ये याचा कस लागणार आहे.

जिल्ह्यात विकासपुरुष म्हणून पालकमंत्री छगन भुजबळांकडे बघितले जाते. गेल्या वेळेस सत्तेत असतांना त्यांनी एकछत्री अंमल ठेवत अनेक विकास कामे खेचून आणली होती. पण, आता तसे चित्र नाही. त्यांचा एकछत्री व एककलमी कामाची पद्धत अजूनही चालूच आहे. त्याला अद्याप उघड विरोध झालेला नाही. पण, महाविकास आघाडी एकसंध आहे, असे चित्र अजून तरी भुजबळांना उभे करता आलेले नाही. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसवर व आपल्यावर जास्त फोकस करण्यात त्यांचे वर्ष गेले. विकासकामाबाबत ते सकारात्मक असले तरी सरकारची आर्थिक स्थिती तितकी मजबूत असणे गरजेचे आहे. ती झाली तर त्यांना काही करता येईल.

एकीकडे महाविकास आघाडीच्या वर्षभराचे मूल्यमापन करत असतांना विरोधी पक्ष कुठे आहे हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. पण, त्यांनाही विरोधकांची प्रखरपणे भूमिका पार पाडता आलेली नाही. अर्थात कोरोनाच्या संकटामुळे त्यांचेही मूल्यमापन करणे योग्य होणार नाही. पण, भाजपकडेही एकसंधपणा दिसत नाही. एकत्रित येऊन काही विषय समोर आणले असेही दिसले नाही. सक्षम प्रमुख नेत्याची उणिव भाजपकडे आजही कायम आहे. त्यामुळे जामनेरहून प्रत्येक वेळेस गिरीश महाजनांना बोलवण्याची वेळ त्यांच्यावर येते.

एकूणच सत्ताधारी व विरोधकांना जनतेने करो..नाचे एक वर्षे माफ करायला हवे. संकट काळात त्यांचे असे मूल्यमापन करणे योग्य होणार नाही. म्हणून त्यांनी पुढील वर्षी तेच रडगाणे न गाता भरीव काही तरी करावे, ही अपेक्षा करुया.

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – मथुरी मावशी – भाग ५

Next Post

दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील सुपुत्राला वीरमरण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

पराभवानंतरही पाकिस्तान संघाला मिळाले इतके कोटी….संजय राऊत यांनी सांगितला धक्कादायक आकडा

सप्टेंबर 15, 2025
VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Next Post
EnxII8AW4AMjh n

दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील सुपुत्राला वीरमरण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011