बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – दर्पण – दूर झाली मरगळ, झळाळली बाजारपेठ

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 6, 2020 | 1:12 am
in इतर
0

दूर झाली मरगळ, झळाळली बाजारपेठ

अर्थव्यवस्थेला कोरोनाने लावलेली नजर विविध सण-उत्सवांमुळे हळूहळू दूर होत आहे. नव्या उत्साहाने पुनर्निर्माण करण्याची जिद्द दिसून येत आहे. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. उद्योग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिकसह विविध क्षेत्राने पुन्हा पकडलेला गिअर सारी मरगळ झटकल्याचेच द्योतक आहे. दिवाळीने तर या उत्साहाला चार चाँद लागणार आहेत.

gautam sancheti
गौतम संचेती
(लेखक इंडिया दर्पणचे संपादक आहेत)

कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी सरकारने लावलेले निर्बंध शाळेचा अपवाद सोडता आता जवळपास उठले आहेत. त्यामुळे आता पुन्हा व्यवहार पूर्ववत सुरु झाले आहेत. गेल्या काही महिन्यात या महामारीमुळे सर्वच ठप्प झाले होते. ते पुन्हा केव्हा सुरळीत होईल याचा अंदाजही येत नव्हता. या काळात अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले तर अनेकांचा रोजगार गेला. हातावर पोट भरणाऱ्यांसाठी तर हा सर्वात कठीण काळ ठरला. त्यामुळे हे संकट तूर्त तरी काही प्रमाणात दूर झाले असले तरी पूर्णपणे टळले नाही. त्यामुळे यापुढील काळात सावधानता बाळगणेही तितकेच गरजेचे आहे.

या सर्व संकट काळात कोणाचे किती नुकसान झाले. किती रोजगार गेला. याचे सर्व आकडे आता हळूहळू बाहेर येतीलच. त्याचवेळी त्याची दाहकता लक्षात येईल. पण, संकटावर मात करुन पुढे जाणे हेच आपल्या हातात आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असतांनाच फेस्टीव्हल सिझन सुरु झाल्यामुळे व्यापार, उद्योगांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहे.

गेल्या काही दिवसात सरकार व औद्योगिक कंपन्यांनी जाहीर केलेल्या बोनसमुळेही दिलासा मिळाला आहे. कंपन्या बंद असल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला. तर काही कंपन्यांनी या काळात आपल्या कामगारांना आधार दिला. त्यात बोनसही जाहीर केला. त्यामुळे तो कामगारांना आधार ठरला आहे. पण, रोजगार गेलेल्या सर्वच कामगारांना अद्याप रोजगार मिळालेला नाही. सात दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे या काळात बाजारपेठ अधिक फुललेल्या दिसणार आहेत. त्या सिझन संपल्यानंतरही तशाच सुरु राहतील, असा अंदाज आहे.

बाजारपेठ

या काळात आपले नुकसान भरुन निघावे यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. अनेक कंपन्यांनी व व्यावसायिकांनी स्किम जाहीर करत सवलती देणे सुरु केले आहे. तर काहींनी या काळात नुकसान भरुन काढण्यासाठी आपले दरही वाढवले आहेत. बांधकाम व्यावसायिकांना या काळात डबल मार बसला आहे. त्यामुळे त्यांनी घर विकावे म्हणून सवलतींचा मारा सुरु केला आहे. त्यामुळे या व्यवसायाला बूस्ट मिळत आहे. तर वाहन उद्योग कोरोना नंतरच्या काळात तेजीत आला आहे. त्यात चारचाकी वाहनांची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसात तर या वाहनांच्या खरेदीतही वाढ झाली आहे. म्हणूनच अनेक कारला दीर्घ प्रतिक्षा ग्राहकांना करावी लागत आहे. पर्यटन व्यवसायाला तर या काळात सर्वाधिक फटका बसला आहे. पण, घरात घरात कंटाळलेली माणसे आता पर्यटनाला जावू लागली आहेत. त्यामुळे काही दिवसात या व्यवसाय तेजी येणार आहे. या प्रमुख व्यवसायाबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायाला गती मिळेल, हे निश्चित.

जिल्ह्यात व्यापार व उद्योगाबरोबरच शेतीचे गणितही तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पिकणा-या कांद्याला चांगला भाव मिळत होता. पण, केंद्र सरकारने लावलेल्या विविध निर्बंधामुळे ते कोसळायला सुरुवात झाली. तरी सुद्धा या संकट काळात मिळणारे पैसे त्यांना दिलासा देणारेच ठरले आहे. या सर्व काळात पावासाने सर्वांना दिलासा दिला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला ही निश्चितच आनंद देणारी गोष्ट ठरली आहे.

रेल्वे सेवा, विमान सेवा, बस या सार्वजनिक सेवा सेवा सुरु झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. शाळा व धार्मिक स्थळे अजूनही बंद आहे. त्यामुळे ते जेव्हा सुरु होतील. त्यावेळेस त्यातूनही दिलासा मिळणार आहे. सरकारने नुकतीच सिनेमागृह, नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी दिली. तशीच ती काही काळानंतर शाळा व धार्मिक स्थळांना मिळेल.

कोरोना काळात झालेल्या नुकसानीचा आकडा अंदाजे २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५ लाख कोटींच्या आसपास होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात तर एकट्या मुंबईचे व्यवहार ठप्प असल्यामुळे रोज ५०० कोटीचे रोज नुकसान झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे एकूण बंद दिवसाची संख्या काढल्यास हाच आकडा मोठा ठरणार आहे. सरकारला या सर्व नुकसानीतून बाहरे पडणे इतके सोपे नाही. त्यामुळे विकासकामांना काही काळ ब्रेक लागले. पण, ती हळूहळू सुरु होईल.

व्यापार, व्यवसाय, रोजगार यापेक्षाही या संकट काळात माणसांमध्ये वाढलेला दूरावा होता. पण, आता तो कमी झाला ही आनंददायी गोष्ट आहे. कोणत्याही संकट काळात शेजारी धावून जात होता. पण, या काळात भीती पोटी त्यांनी राखलेले अंतर सर्वांनाच वेदनादायी ठरले. आता हा दूरावा संपला तसा कोरोनाही संपेल ही आशा करु या…

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – आक्काचे लग्न – भाग ५

Next Post

वाह ! अभिनेत्री मधुरा वेलणकर ‘कोविडयोद्धा’ म्हणून सन्मानित, नवोदीतांना दिली अशी संधी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250903 WA0169
राज्य

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य सेवा ठप्प

सप्टेंबर 3, 2025
504964666 10162987121630185 6970881276982871830 n e1756878957672
संमिश्र वार्ता

मराठ्यांची फसवणूक? विधीज्ञ असीम सरोदे यांनी उपस्थितीत केले हे प्रश्न

सप्टेंबर 3, 2025
fir111
क्राईम डायरी

कर्जाच्या वसूलीसाठी महिलेस अश्लिल शिवीगाळ…फायनान्स कंपनी विरुध्द गुन्हा दाखल

सप्टेंबर 3, 2025
jail1
क्राईम डायरी

बसमध्ये चढतांना प्रवाशांच्या दागिण्यांवर डल्ला मारणा-या अहिल्यानगर येथील टोळीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

सप्टेंबर 3, 2025
Screenshot 20250903 090638 Facebook
संमिश्र वार्ता

गायक राहुल देशपांडे यांचा घटस्फोट…वैवाहिक आयुष्याची १७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर घेतला निर्णय

सप्टेंबर 3, 2025
Untitled
महत्त्वाच्या बातम्या

हा जीआर म्हणजे फक्त कागद कोणालाही फायदा नाही…विनोद पाटील यांचा गंभीर आरोप

सप्टेंबर 3, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

असा घेतला तातडीने निर्णय…उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती

सप्टेंबर 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

कुणबी जातीचे प्रमाणपत्रासाठी आता गावपातळीवर समित्या….शासन निर्णय निर्गमित

सप्टेंबर 3, 2025
Next Post
madhura velankar

वाह ! अभिनेत्री मधुरा वेलणकर 'कोविडयोद्धा' म्हणून सन्मानित, नवोदीतांना दिली अशी संधी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011