मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – दर्पण – कांद्याचे लिलाव पूर्ववत; प्रश्न अनेक

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 30, 2020 | 1:04 am
in इतर
0

कांद्याचे लिलाव पूर्ववत; प्रश्न अनेक

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत होतीलही पण गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता कांद्याच्या संदर्भातील अनेक प्रश्न निरुत्तरीतच राहिले आहेत. वर्षानुवर्षे हे प्रश्न जैसे थे आहेत. आजचे मरण उद्यावर ढकलले तरी समस्या राहणारच आहे. त्यासाठीच देशपातळीवर कांद्याचे सर्वंकष धोरण निश्चित करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

gautam sancheti
गौतम संचेती
(लेखक इंडिया दर्पणचे संपादक आहेत)

घाऊक व्यापा-यांना २५ टन तर किरकोळ व्यापा-यांना २ टन कांदा साठवणुकीची मर्यादा केंद्र सरकारने लादल्याने नाशिक जिल्ह्यातील व्यापा-यांनी सोमवारपासून लिलावात सहभाग न घेण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर या प्रश्नावर दोन दिवसांनी तोडगा काढण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न सुरु झाले. पहिले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापारी व शेतक-यांबरोबर चर्चा केली. अखेर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून तात्पुरता तोडगा निघाला. आता हे लिलाव चार दिवसांनी पूर्ववत सुरु होणार असले तरी त्याबरोबर असंख्य प्रश्न व्यापा-यांच्या मनात आहेत. केंद्र सरकारने काही अटी शिथील केल्या असल्या तरी व्यापार करण्यासाठी त्या पुरेशा नाही. त्यामुळे रिस्क घेऊन लिलावात कांदा खरेदी करणे व्यापा-यांना इतके सोपे नाही. त्यामुळे लिलाव सुरु झाले तरी शेतक-यांचा कांदा पूर्णपणे विकला जाईल का हा प्रश्नच आहे.

खरं तर कांद्याबाबत असंख्य प्रश्न नेहमी उपस्थितीत होतात. पण, त्यावर कायमस्वरुपी तोडगा कधी निघत नाही. सरकार कोणाचेही असो या प्रश्नाकडे गांभीर्याने कधी बघितले गेले नाही. हा प्रश्न पेटत ठेऊन राजकारण मात्र केले जाते. सरकारचे धोरणही कांद्याबाबत नेहमी बदलत असतात. म्हणूनच कांद्याचे उत्पादन घेणे व व्यापार करणे आता जिकरीचे होऊ लागले आहे. एकीकडे केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून कांद्याला वगळले. त्यानंतर त्यावर निर्बंध लावले. दोन दिवसांपूर्वी नाशिक दौ-यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही कांदा उत्पादकांशी चर्चा केली. केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळला आहे. तसेच, कांदा आयात व निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत असून कांद्याबाबत केंद्र शासनाची ही भूमिका परस्परविरोधी असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले. व्यापा-यांवर टाकलेल्या धाडी व नाफेड विकत असलेल्या कांद्याबाबतही पवारांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपची सत्ता नसतांनाही असे प्रश्न निर्माण होत होते. पण, त्याची दखल घेतली जात होती. आता केंद्र सरकार या प्रश्नांकडे संवेदनशील नजरेने बघत नाही. जे निर्णय आतापर्यंत घेतले गेले आहे. ते कांदा उत्पादक शेतक-यांना मारक ठरले आहेत. कांद्याचे भाव वाढले तर त्याचा फटका बिहार निवडणुकीत बसेल यामुळे हे निर्बंध लादले गेले. पण, त्यावर उपाय काढण्याचे अनेक मार्ग होते. ते न करता थेट शेतक-यांना फटका बसेल, असे निर्णय घेतल्यामुळेच  शेतक-यांमध्ये केंद्र सरकार विरुद्ध रोष निर्माण झाला आहे.

या प्रश्नावर अखेर कृषी मंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक गुरुवारी घेतली. त्यात तोडगा निघाला. दिवाळीचा सण तोंडावर असतांना लिलाव बंद ठेवणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर व्यापा-यांनी लिलाव सुरु करण्यास होकार दिला. हा प्रश्न तूर्त सुटला असला तरी अनेक प्रश्न कायम आहेत.

गुरुवारी याच प्रश्नावर प्रहार संघटनेने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर उपनिबंधकांनी सुद्धा लिलाव सुरु ठेवण्याचे आदेश दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला. त्याअगोदर शेतकरी उत्पादक संघटना व इतर संघटना व राजकीय पक्षांनी सुद्धा या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. पण, हे सर्व प्रयत्न जर संघटीतपणे केले गेले असते तर त्यातून सरकारचे लक्ष लवकर वेधणे शक्य झाले असते. या प्रश्नांवर सामूहिक लढा देण्याची गरज आहे. त्यात राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, व्यापारी यांनी एकत्रित येऊन या प्रश्नांवर आवाज उठवला तर पुन्हा असे प्रश्न निर्माण होणार नाहीत.

नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे या कांद्याचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो. त्यावेळेस दैनंदिन व्यवहारावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हा प्रश्न कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यापुरताच मर्यादित राहत नाही. तो सर्वांशीच निगडीत आहे.

कांदाच का ?

देशात अनेक वस्तूंचे भाव वाढत असतात. पण, त्याकडे सरकार फारसे लक्ष सरकार देत नाही. पण, कांद्याच्या बाबतीत असे होत नाही. कांद्याचे भाव वाढले की सर्वच डोळे वटारतात व सरकारही निर्बंध लादते. अगोदर निर्यातबंदी केली. त्यानंतर व्यापा-यांवर धाडी टाकल्या. त्यानंतर साठवणुकीवर मर्यादा टाकली. हा सर्व प्रकार संतापजनकच आहे. कोरोनामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडला. त्यानंतर पावसाने झोडपले. त्यात मोठ्या प्रमाणात कांदा सडला. त्यातूनही चार पैसे मिळत असतांना सरकारने ते हिरावून घेतले. आता तर जे कांदा बियाणे महागड्या दराने आणले तेही पावसात वाहून गेले. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. नेहमी असेच होत गेले तर शेतक-यांना थांबवणे सरकारच्या हातात राहणार नाही.

बिहार निवडणूक

आता या प्रश्नावरुन भाजप आघाडीची बिहार मध्ये हार झाली तर कांद्याला गुन्हेगार ठरवू नये. अन् विजय मिळाला तर निर्बंध योग्य होते असे म्हणू नये. नाहीतर दोन्ही बाजूंनी कांद्याचे वांदेच होतील. अगोदरच तीन राज्यात सरकार पाडल्याचा कांद्यावर ठपका आहेच. त्यात आता नवीन वाढ होते की तो ठपका तसाच राहतो हे बिहारच्या निकालानंतर कळेल. तूर्त तरी लिलाव सुरु झाले याचा आनंद घेऊ या…

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रंजक गणित- कोडे क्र ४० (सोबत कोडे क्र ३८चे उत्तर)

Next Post

श्यामची आई संस्कारमाला – भाग ५ – कौटुंबिक संवाद

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
e1603635564457

श्यामची आई संस्कारमाला - भाग ५ - कौटुंबिक संवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011