मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – दर्पण – खडसे अन् उत्तर महाराष्ट्र

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 23, 2020 | 1:08 am
in इतर
0
khadse

खडसे अन् उत्तर महाराष्ट्र

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपकडून सहाजिकच काही परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. पण, खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे. त्याची झलक नजिकच्या काळात दिसणार आहे.

gautam sancheti
गौतम संचेती
(लेखक इंडिया दर्पणचे संपादक आहेत)

खडसे हे भाजपचे ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजपला मोठा धक्का तर बसला आहेच. पण, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्यही त्यामुळे खचले आहे. उत्तर महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात खान्देशचे राजकारण वेगळे आहे. खान्देशमध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबारचा समावेश आहे. तर नाशिक जिल्हा हा स्वतंत्र आहे. नगरमध्ये पक्षापेक्षा व्यक्तीनिहाय राजकारणाला महत्त्व आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यात खडसे यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला काय फायदा होईल, हे महत्त्वाचे आहे. खडसे यांचा सर्वात जास्त दबदबा हा जळगावमध्ये आहे. त्यामुळे येथील राजकारणात त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. एकेकाळी येथे काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. पण, खडसे यांनी हे वर्चस्व मोडून काढले. त्यामुळे राष्ट्रवादीची या जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली होती. पण, आता खडसे यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. त्यात धुळे व नंदुरबार मध्ये राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. नाशिक व नगरमध्ये राष्ट्रवादीची स्थिती बरी आहे. येथे खडसेंमुळे त्यात भर पडणार आहे.

खडसे अभ्यासू असून ते फर्डे वक्ते आहेत. त्यांचे बोलणे सुद्धा बेधडक आहे. कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. या सर्व गोष्टींचा फायदा उत्तर महाराष्ट्रात निश्चितच राष्ट्रवादीला होईल. खडसे यांच्या नेतृत्वाखालीच उत्तर महाराष्ट्रात २०१४ ची निवडणूक लढवली गेली. त्यावेळेस भाजपला सर्वाधिक यश या भागातून मिळाले होते. त्यात खडसे यांचा वाटा निश्चित मोठा होता. विरोधी पक्ष नेते व मंत्रिपदावर असतांना त्यांनी अनेक कामे या भागात केली. त्यामुळे त्याचा उपयोगही आता होणार आहे.

भाजपची राज्यात सत्ता असतांना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे खच्चीकरण झाले. तीच चाल आता राष्ट्रवादीने सुरु केली आहे. त्यात पहिला प्रवेश खडसे यांचा झाला आहे. आता यापुढे असे अनेक प्रयोग नजिकच्या काळात राष्ट्रवादी करेल व आपले उट्टे काढेल. पण, राष्ट्रवादीला हे मोठे नेते आपल्या पक्षात घेऊन पक्ष चालवणे वाटते तितके सोपे नाही. खडसे महत्वाकांक्षी नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांना त्यांची खडसेशाही सुद्धा सहन करावी लागणार आहे.

खडसे यांनी अनेक चुका केल्या आहेत. त्यांनी दोन वेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्षपद नाकारले. त्यामुळे त्यांची पुढील संधी गेली. पहिल्या वेळेस त्यांनी हे पद नाकारले त्यावेळेस नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर ते केंद्राच्या राजकाराणात व मंत्री सुद्धा झाले. दुस-यांदा जेव्हा नाकारले तेव्हा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले व पुढे ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांचा अभ्यासूपणा, ज्येष्ठपणा त्यांना आडवा आला. येथून त्यांचे खच्चीकरण भाजपने केले. पण, थांबतील यातले खडसे नाहीत. त्यांनी हे सहन केले असले तरी ते त्याचा बदला जरुर घेतील, असे त्यांना ओळखणारे नेहमी चर्चेत सांगतात. त्यामुळे त्यांनी सत्ता पक्षात जाणे पसंत केले. केंद्र सरकारचा वापर करुन आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सुनेला तूर्त भाजपमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे खडसे कोणाचा सूड आता कशा पध्दतीने घेतील, हे सुध्दा पुढे दिसेल. यात पहिले उत्तर महाराष्ट्राचे काही नेते असतील हे नक्की.

खडसे यांच्या जाण्याने भाजपला जसे नुकसान झाले. तसा फायदा सुद्धा होणार आहे. खडसे यांच्या ज्येष्ठपणामुळे त्यांच्या आरोपाला थेट उत्तर भाजपच्या नेत्यांना देता येत नव्हते. त्यात शिस्तप्रिय असलेल्या भाजपला त्यांचे बोलणेही मुकाट्याने सहन करावे लागत होते. आता तसे होणार नाही. भाजपही खडसेंच्या आरोपाला सडेतोड उत्तर देईल. पण, खडसेंचे प्रत्त्युतरही त्यांना सहन करावे लागेल. उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांना आता नेतृत्व करण्याची संधी मिळेल. ते आता भाजपचे ज्येष्ठ नेते असतील.

खडसेंच्या जाण्याने जसा भाजपला फटका बसणार आहे. तसा तो शिवसेनेलाही असणार आहे. त्यांच्या मतदारसंघात तर शिवसेनेचे आमदार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही शिवसेनेकडे आहे. त्यामुळे खडसे यांचा प्रवेश त्यांच्यासाठी सुद्धा डोकेदुखी आहे. खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जसा सुप्त वाद आहे. तसा तो शिवसेनेचे नेते सुरेश जैन, गुलाबराव पाटील यांच्याबरोबर उघड आहे. त्यामुळे हा वाद बाजूला ठेऊन त्यांना भाजपवर नेम धरावा लागणार आहे. त्यात शिवसेनेचा बाण अंगावर येऊ नये, याची काळजी सुद्धा त्यांना घ्यावी लागेल

एकूणच खडसे यांच्या जाण्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलेल. त्यामुळे त्याचा काय फायदा झाला किंवा नुकसान यासाठी आता तरी पुढील निवडणुकीची वाट पहावी लागेल. तूर्त तरी खडसे अजून काय शाब्दिक हल्ले करतात व भाजप त्याला कसे परतवून लावते, हेच बघणे आपल्या हातात आहे.

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशीभविष्य – शुक्रवार – २३ ऑक्टोबर २०२०

Next Post

अखेर रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

अखेर रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी जास्त लालच करू नये, जाणून घ्या, मंगळवार, १९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 18, 2025
IMG 20250818 WA0412 1 e1755531320386

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषण दूत’…अति तीव्र कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी उपक्रम

ऑगस्ट 18, 2025
WhatsApp Image 2025 08 18 at 20.07.37 a5968ef3 e1755529997731

क्रेडाईच्या प्रॉपर्टी प्रदर्शनात १०० कोटींची उलाढाल…पाच दिवसानंतर समारोप

ऑगस्ट 18, 2025
Gyo9SFeWwAEOeRf

टोल कर्मचाऱ्यांनी लष्करी कर्मचाऱ्यांशी केले गैरवर्तन….एनएचएआयने टोलनाक्याला २० लाखाचा दंड ठोठावत केली ही कारवाई…

ऑगस्ट 18, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद…या मुद्द्यांवर झाली चर्चा

ऑगस्ट 18, 2025
WhatsApp Image 2025 07 21 at 8.31.40 PM 1024x537 1

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने चिमुकल्या देवांशीवर यशस्वी शस्त्रक्रिया….

ऑगस्ट 18, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011