शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण विशेष – दर्पण – ग्रामपंचायतीतला लिलाव पॅटर्न, लोकशाहीला घातक

by Gautam Sancheti
जानेवारी 2, 2021 | 6:15 am
in इतर
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


ग्रामपंचायतीतला लिलाव पॅटर्न, लोकशाहीला घातक

लोकशाही व्यवस्थेतील सर्वात शेवटचा किंवा प्राथमिक घटक असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा सध्या उडत आहे. मात्र, विकासापासून वंचित असलेल्या गावांमध्ये अचानक लिलाव पॅटर्नने उसळी घेतली आहे. काय आहे हा पॅटर्न, तो लोकशाही बळकट करणारा आहे का, याचा हा परामर्श…

gautam sancheti
गौतम संचेती
(लेखक इंडिया दर्पणचे संपादक आहेत)

राज्यात ३४ जिल्ह्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायती असून त्यात ५ हजार ८९५ जागा आहेत. या जागेवर सदस्य निवडले जाणार आहेत. आतापर्यंत या जागेसाठी १६ हजाराच्या आसपास उमेदवारी अर्ज भरले आहेत. ४ जानेवारीला माघारीनंतर त्याबाबत चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर किती उमेदवार रिंगणात रहातात हे महत्त्वाचे असणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी ही १८ तारखेला आहे. पण, त्याअगोदर काही ठिकाणी या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यात देवळा तालुक्यातील उमराणे येथील निवडणूक दोन कोटी पाच लाखाच्या लिलावामुळे राज्यभर चर्चेची ठरली आहे.

ग्रामपंचायतीच्या या निवडणुका बिनविरोध व्हाव्या म्हणून अनेक ठिकाणी आमदारांनी गावाच्या विकासासाठी कुठे २५ तर काही ठिकाणी ५० लाख निधी देण्याची घोषणा केली. त्यामुळे या वर्षी अनेक ठिकाणी या निवडणुका बिनविरोध झाल्या. खरं तर देशात निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बाराही महिने कुठे ना कुठे निवडणूक होत असते. पण, त्यात असा बिनविरोधचा पॅटर्न देशभरातील सर्वच निवडणुकांसाठी लागला तर किती बरं होईल. पण, त्यातून निकोप लोकशाही येईल का हा खरा प्रश्न आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत जातीवाद, भाऊबंदकी, गट-तट तयार होतात व त्यामुळे गावाचा विकास खुंटतो असे बिनविरोध करण्यामागे कारण सांगितले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीत हे जर होत असेल तर इतर निवडणुकीत ते होत नाही असे म्हणणे सुध्दा संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीबरोबरच पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुका सुद्धा अशाच बिनविरोध व्हायला हव्यात. स्थानिक स्वराज संस्थेत जर हा पॅटर्न यशस्वी होत असेल तर विधानसभा व लोकसभेने सुद्धा का मागे रहावे. तेथेही असेच केले तर अजून बरं होईल. या निवडणुका बिनविरोध करतांना लिलाव हा तर आणखी एक पर्याय समोर येत आहे. त्यामुळे देशाचे अनेक प्रश्न सुटतील. पण, तसे होणे इतके सोपे नाही….निवडणूक

खरं तर सर्व जण निवडणुकीला दोष देतात. पण, निवडणुकीतील दोष दूर करत नाहीत. कोणतीही निवडणूक असो त्यात हिंसा, गैरमार्ग, आक्रमक आणि खुनशी स्पर्धा असते. या गोष्टी कशा संपवता येईल यावर मात्र कोणी विचार करत नाही. हे जर संपवले तर निवडणुका निकोप होतील. त्यामुळे निवडणुकांना दोष देण्यापेक्षा त्यातील दोष संपवणे गरजेचे आहे. जर निवडणुकीत मतदारांनी पैसेच घेतले नाही तर निवडून येणा-या उमेदवारांवर सुद्धा बंधने येतील. पण, तसे होत नाही. अनेक ठिकाणी काही मतदार मतदानासाठी पैसे घेतात व त्यातून पुढे या निवडणुकीचे गांभीर्य संपते. त्यामुळे निवडणुकी बिनविरोध आणि लिलाव करण्यापेक्षा त्यातील गैरप्रकार बंद करण्यावर भर दिला तर हा पॅटर्न सर्वच निवडणुकांना लागू होईल व त्यातून खरी लोकशाही निर्माण होईल.

कोणतीही संस्था असो तेथे सत्ताधारी बरोबरच विरोधी पक्षही सक्षम असणे गरजेचे असते. त्यामुळे विचारांची आदान प्रदान होते. एकछत्री कारभार होत नाही. पण, या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करुन बिनविरोधसाठी सर्व सरसावले व त्यातून लिलावाची पध्दत रुजू झाली. ती लोकशाहीला सर्वात घातक आहे.

देवळा तालुक्यीत उमराणे येथे ग्रामदैवत रामेश्वर महाराज मंदिराच्या बांधकाम निधीसाठी हा लिलाव झाला. जे पैशांनी सशक्त होते. त्यांनी तो लिलाव घेतला व येथेच लोकशाहीचा खून झाला. खरं तर मंदिर उभारण्यासाठी असा गैरमार्गाचा अवलंब करण्याची गरजच नव्हती. हे गाव पैशांनी तसे सशक्त आहे. त्यामुळे गावातील सर्वांनी एकत्र येऊन वर्गणीद्वारे ते केले असते तर अशी लिलाव करण्याची गरज ग्रामस्थांवर आली नसती. जाहीर लिलाव पद्धतीने हे केले व प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले हे सुद्धा लोकशाहीसाठी भयावह असेच आहे.

खरं तर ग्रामपंचायती पूर्वी सारख्या राहिलेल्या नाहीत. पूर्वी निधीची कमरता होती. पण, आता निधी मोठ्या प्रमाणात व थेट येत असल्यामुळे त्याचा विकास कामासाठी योग्य उपयोग होतो की नाही यावर नजर ठेवण्याची गरज आहे. जिल्हा विकास आरखड्याच्या आकड्यापेक्षा जास्त निधी आता सर्व ग्रामपंचायतील मिळतो. त्यामुळे येथे सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. बिनविरोध आणि लिलाव निवडणुकीतून आपल्या गावाचा विकास होईल असा समज करुन अनेकांनी प्रयत्न केले. पण, त्यातून फारसे काही साध्य होणार नाही. त्यासाठी निवडणुका सर्वात चांगला मार्ग आहे. येथे स्पर्धा असते, त्यामुळे कामांना वेग येतो. जेथे स्पर्धा संपते तेथे कामातही संथपणा येतो. त्यामुळे निवडणुका व्हाव्यातच. पण, त्या झाल्यानंतर सर्वांनी एकोप्याने एकत्र येऊन गावाचा विकास करावा. चुकीचे काम होत असेल तर तेथे बोट दाखवावे, चांगले काम झाले तर त्याचे कौतुक करावे, यातून लोकशाही सशक्त होईल.

पण, असे केले नाही तर  लिलावत जसे व्यापारी रिंग करुन भाव पाडतात. तेव्हा ते सर्व एकत्र येतात. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी श्रीमंत लोक एकत्र येतील व ते ग्रामस्थांनाच पैशाच्या जोरावर तोंडासमोर पाडतील. पुढे यातूनच मनमानी, एकछत्रीपणा, अरेरावी व व्यापारीकरण सुरु होईल. तेव्हा ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार सुद्धा राहणार नाही. लिलाव घेतला आहे. बोलायचे काम नाही, असे उत्तर येईल. यामुळेच तोंड दाबून बुक्याचा मार गावकऱ्यांना सहन करावा लागेल. आणि या म्हणीचा अर्थही कळेल…..

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत आणि ब्रिटन विमानसेवा आठ जानेवारीपासून पुन्हा सुरु होणार

Next Post

या वर्षात शनीचा कुंभ राशीवर कसा राहणार प्रभाव?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

या वर्षात शनीचा कुंभ राशीवर कसा राहणार प्रभाव?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
Pharmacy

एसएमबीटी फार्मसीच्या ७२ जणांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड; लाखोच्या पॅकेजवर भरती

ऑगस्ट 7, 2025
क्रीडा व युवक कल्याण विभाग आढावा बैठक 1 1 scaled 1

नव्या खात्याची नवी जबाबदारी….क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी पदभार घेताच दिले हे निर्देश

ऑगस्ट 7, 2025
Screenshot 20250807 190254 Facebook

केंद्रीय अर्थमंत्री व वाणिज्यमंत्री यांची नाशिकच्या तिन्ही खासदारांनी घेतली भेट…कांदा प्रश्नांकडे वेधले लक्ष

ऑगस्ट 7, 2025
RUPALI

खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ, १४९७ नग्न फोटो…रुपाली चाकणकर यांची खळबळजनक माहिती

ऑगस्ट 7, 2025
IMG 20250807 WA0307 2

या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा सर्वोत्कृष्ट तर ही नाट्यकृती द्वितीय

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011