रविवार, ऑगस्ट 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – तरंग – इथे भूक मरते…

by Gautam Sancheti
मार्च 21, 2021 | 12:38 am
in इतर
0

इथे भूक मरते …

आपले काही मंत्री महोदय काही वेळा अशी विधाने करतात की ती ऐकून काय करावे ते काहीच सुचत नाही. गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांच्या अनेक मंत्र्यांनी विविध विषयांवर मारलेले षटकार अजूनही लोकांच्या स्मरणात असतील. शुक्रवारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांनी केलेले विधानही तसेच आहे.
IMG 20200829 WA0014
अशोक पानवलकर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
ashok.panvalkar@gmail.com
एका संस्थेतर्फे ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’  काही महिन्यांपूर्वी जाहीर झाला. त्यात १०७ देशांमध्ये भारताचा क्रमांक ९४वा  लागला आहे. ”आपण एनजीओनी केलेल्या अशा अहवालांकडे अजिबात लक्ष देता कामा नये. आपल्याकडे एखाद्या भटक्या कुत्रीने पिलांना जन्म दिल्यावर तिला शिरा तयार करून भरविण्याची प्रथा गावांमध्ये आहे.  भटक्या कुत्र्यांनीही आपण ज्या देशात खाऊ घालतो, तिथे माणसे कशी उपाशी राहतील”, असा सवाल रुपाला मंत्रिमहोदयांनी विचारल्याचे बातमी प्रसिद्ध झाली आहे.
 गावातल्या महिला जेव्हा या कुत्रीला शिरा भरवतात तेव्हा काही वेळा ती महिलांना चावतेही, पण तरी तिला शिरा दिला जातो, अशा देशात माणसे व मुले कशी भुकेली राहतील,” असे रुपाला म्हणतात. भारताने अहवालाबाबत आक्षेप घेतला असून त्यातील भारताबाबतचे आकडे कोणत्या आधारावर गोळा केले आहेत अशी विचारणा केल्याचेही मंत्री म्हणाले. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका येथे आपल्यापेक्षा चंगली स्थिती असल्याचे अहवाल म्हणतो. परंतु, भारतात आजघडीला ५२९ लाख टन अन्नसाठा गोदामांमध्ये पडून आहे, अशा स्थितीत कोणी मुले भुकेली असतील हे शक्यच नाही, असे रुपाला म्हणतात.
मी शेतीतज्ज्ञ वगैरे अजिबात नाही. परंतु रुपाला यांच्या संसदेतील वक्तव्यानंतर भारतात कोणीही मूल भुकेले नाही, सर्वाना वेळेवर उत्कृष्ट अन्नधान्य मिळून सर्वांची तब्येत गुटगुटीत आहे, असा भास मात्र काही क्षण मला झाला. ‘ग्लोबल हंगर इंडेक्स ‘  हा  ‘वेल्थहंगरलाईफ ‘ या एनजीओतर्फे तयार केला जातो. वर उल्लेखलेला ताजा अहवाल २०२० सालचा असून  २०१९च्या अहवालात ११७ देशांमध्ये १०२व्या क्रमांकावर होता.

Eki 7kkUUAALZTs

हा इंडेक्स कसा तयार केला जातो ? त्यासाठी चार निकष वापरले जातात. १) एकूण लोकसंख्या आणि कुपोषित लोकांचे प्रमाण २) शारीरिक उंचीच्या प्रमाणात वजन कमी असलेल्या पाच वर्षांखालील मुलांचे प्रमाण ३) पाच वर्षाखालील मुलांची वयाच्या मानाने कमी असलेली उंची ४) पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर . अतिउच्च उत्पन्न असलेले देश तसेच अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या देशांना या अहवालातून वगळले जाते. शंभरपैकी ९.९ पर्यंतच्या श्रेणीला अगदी कमी, १० ते १९.९ पर्यंतच्या श्रेणीला मध्यम, २० ते ३४.९ पर्यंत गंभीर, ३५ ते ४९.९ पर्यंतच्या श्रेणीला चिंताजनक (अलार्मिंग), ५० च्या पुढे अतिशय चिंताजनक परिस्थिती असे म्हटले जाते. भारताची स्थिती २००० साली ३८.९ होती, ती २०२० मध्ये २७.२ झाली. म्हणजेच चिंताजनक स्थितीतून आपण गंभीर स्थितीत आलो. गेल्या २० वर्षांत आपण तुलनेने बरीच प्रगती केली. ही गोष्ट स्वागतार्ह आहे. परंतु पाकिस्तान (२४.६), बांगलादेश (२०.४), नेपाळ (१९.५) हे देश  आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत (‘ग्लोबल हंगर इंडेक्स ‘ बाबत ) आहेत असे हा अहवाल म्हणतो.
केंद्र सरकारच्या पत्रानंतर ‘वेल्थहंगरलाईफ ‘ संघटनेची काय प्रतिक्रिया होती, त्यांनी ही ‘चूक’ सुधारली का, वगैरे माहिती कळू शकली नाही. प्रश्न आपण २७.२ श्रेणीवर आहोत की २५.२ हा नाही. किंवा एखाद्या अहवालामुळेच  आपल्याला आपला हंगर इंडेक्स कळतो, असेही नाही. प्रश्न सध्या भारतात कोणीच भुकेले नाही, कुपोषित नाही या भ्रमात राहण्याचा आहे.
देशाचे कशाला, आपण महाराष्ट्रातील कुपोषण आणि त्याने होणारे बालकांचे मृत्यू याच्या असंख्य बातम्या नेहमी वाचतो. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये २९ डिसेंबर २०१८ रोजी आलेली बातमी बघा – ”राज्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न व त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचा गंभीर प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात राज्यात ११ हजार ९३२ बालमृत्यूची नोंद झाली आहे. लहान मुलांच्या मृत्यूचे हे प्रमाण धक्कादायक असताना तीव्र कमी वजनाच्या बालकांचेही प्रमाणही वाढते आहे. या मुलांकडे जर वेळीच लक्ष देण्यात आले नाही तर त्यांनाही मृत्यूच्या खाईत ढकलल्यासारखे होणार आहे, असे आकडेवारीमधून स्पष्ट दिसते.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माहितीनुसार, दगावलेली मुले शून्य ते पाच वयोगटातील आहेत. यामध्ये शून्य ते एक वर्ष वयोगटातील ९ हजार ३७९ मुलांचा, तर १ ते ५ वर्षे वयोगटातील २ हजार ५५३ मुलांचा समावेश आहे. कुपोषित मुलांसाठी पोषण आहाराच्या योजना आखल्या जातात, तत्पर वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात असतील तर हे बालमृत्यू रोखण्यास सरकार अपयशी का ठरते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

Ek6H9I9UcAAizlg

जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यामधील उपलब्ध आकडेवारीचा अभ्यास केला तर सप्टेंबरमध्ये कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसते. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची पोषण स्थिती काळजी करायला लावणारी आहे. एकूण वजन घेतलेल्या मुलांचे प्रमाण ५८ लाख ७७ हजार २८१ इतके आहे, त्यात साधारण श्रेणीतील ५२ लाख ३५ हजार ९९४ मुले आहेत तर मध्यम कमी वजनाच्या मुलांमध्ये ५ लाख ५२ हजार ९२४ मुलांचा समावेश आहे. तीव्र कमी वजनाच्या गटात ८८ हजार ३६३ मुले येतात. मध्यम आणि तीव्र कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण ६ लाख ४१ हजार २८७ आहे. ”
या आणि अशा प्रकारच्या बातम्या नेहमी वाचायला मिळतात. कदाचित मंत्रीमहोदयापर्यंत त्या कोणी पोचवत नसेल. ‘वेल्थहंगरलाईफ ‘चा हा  अहवाल किती अचूक आहे, त्यात त्रुटी  असल्याच तर किती प्रमाणात आहेत याचा अभ्यास जरूर व्हावा. परंतु, कुत्रीलासुद्धा शिरा खायला दिला जातो, तिथे माणसे कशी उपाशी राहतील, असे विचारणे म्हणजे  अवघ्या जनतेचा अपमान आहे. माणसाला खायलाच न मिळणे (हंगर – भूक) आणि निकृष्ट अन्न खायला मिळाल्याने कुपोषण होणे या दोन वेगवेगळ्या बाबी असल्या तरी एकमेकांशी निगडित आहेत.0
भारतात आजही कुपोषणाने मरण पावत असलेल्या बालकांची आकडेवारी प्रचंड आहे. सरकारी खात्यांमार्फतच ही आकडेवारी पत्रकारांना दिली जाते किंवा भारतात या क्षेत्रात काम करत असलेल्या अनेक संस्थांकडे ही माहिती उपलब्ध असते. हा प्रश्न फक्त देशातल्या गोदामात किती अन्नधान्य साठवले आहे याचा नाही. ते गरिबातल्या गरिबांपर्यंत पोचवले जाते का, न पोचल्यास का नाही, आणि त्रुटी असल्यास काय करायला हवे यावर विचार व्हायला हवा. ते सोडून मंत्र्यांना शिरा आठवला, हे काही बरे नव्हे!
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव – थीएटर समोरील गर्दी प्रकरणी गुन्हा दाखल, जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती

Next Post

या बांगलादेशी न्यूज अँकरची जीवन कहाणी आहे अतिशय हृदयद्रावक…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GzFrSrPWAAAt v1
महत्त्वाच्या बातम्या

IADWS ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार…संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती

ऑगस्ट 24, 2025
Untitled 41
संमिश्र वार्ता

विशेष लेख…उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक रंगणार दक्षिण विरुद्ध दक्षिण

ऑगस्ट 24, 2025
crime1
क्राईम डायरी

दुचाकी अडवून चाकूचा वार करुन दोघांनी हॉटेल व्यावसायीकाला लुटले…नाशिकमधील भररस्त्यावरील घटना

ऑगस्ट 24, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशाने जप्त केलेली ४५.२६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता केली परत…नेमकं काय आहे प्रकरण

ऑगस्ट 24, 2025
Untitled 40
संमिश्र वार्ता

मराठी लोक भंगार है म्हणणा-या परप्रांतीयला मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप…नाशिकमधील घटना

ऑगस्ट 24, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

शिंदे यांच्या तातडीच्या निरोपानंतर नाराज तानाजी सावंत मुंबईत दाखल, दोन तास चर्चा…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी झटपट लाभाचा मार्ग तूर्तास टाळावा, जाणून घ्या, रविवार, २४ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 23, 2025
IMG 20250823 WA0414 1
स्थानिक बातम्या

‘करघा पैठणी द क्वीन ऑफ सारीज’ या चित्रपटाचे येवल्यात स्पेशल स्क्रिनिंग…मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

ऑगस्ट 23, 2025
Next Post
EvyviThUcAYyZKz

या बांगलादेशी न्यूज अँकरची जीवन कहाणी आहे अतिशय हृदयद्रावक...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011