मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – तरंग – आपण आशादायी राहू….

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 15, 2020 | 1:04 am
in इतर
0
EmpRRb7XUAAFEWZ

आपण आशादायी राहू… 

नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन्हीचा आनंद घेतल्यावर आता उद्या बलिप्रतिपदा पाडवा आणि भाऊबीज. आणि दीपावलीचा शेवटचा दिवस. मार्चमध्ये येणारा गुढी पाडवा म्हणजे आपण हिंदूंचा नववर्षारंभ. बऱ्याच जणांसाठी, नवीन वर्ष कसे साजरे करायचे, त्यात काय काय संकल्प करायचे हे ठरविण्याचा दिवस. ते संकल्प पुढे किती पाळले जातात हा भाग वेगळा. तसे संकल्प करण्याचा प्रकार दिवाळी पाडाव्यापासून होत नाही हे खरे असले तरी यंदाच्या दिवाळी पाडव्यालाही आपण प्रत्येकालाच काही न काही संकल्प करण्याची वेळ आली आहे, असे समजायला हरकत नाही. याचे कारण कोरोना!

IMG 20200829 WA0014
अशोक पानवलकर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
[email protected]

कोरोनामुळे प्रत्येकाचे आयुष्य बदलून जाणार आहे. किंबहुना बदलून गेलेच आहे. आणि हे फक्त ‘वर्क फ्रॉम होम’पुरतेच बदलले असे अजिबात नाही. खण्यापिण्याच्या सवयींपासून ते सर्व बदलले आहे. एकमेकांशी संपर्क साधण्याची पद्धत बदलली आहे. प्रत्यक्ष भेट झाली तरी थोडा परकेपणा ठेवावा, ही जाणीव प्रत्येकात आली आहे. गेल्या नऊ महिन्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. देशाची आणि प्रत्येक माणसाची अर्थव्यवस्था बदलली. देशादेशांमधले संबंध बदलले. परदेशात शिकण्यासाठी गेलेला माणूस तिथेच अडकून पडला. जाऊ इच्छिणारेही अडकून पडले. उद्योगधंदेही ‘सेटबॅक’ मोडमधून अजून बाहेर येऊन ‘कम बॅक’ मोडमध्ये आलेले नाहीत.

गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी आत्मनिर्भर ३.० योजना जाहीर करून अर्थव्यवस्थेत आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक माणसात जान आणण्याचा प्रयत्न केला. या योजनांचे आकडे पाहिले की भोवळ येते. ही तिसरी योजना २.६५  लाख कोटी रुपयांची आहे. तिन्ही योजना (सरकार व रिझर्व बँक) मिळून हा आकडा २९ लाख ८८ हजार लाख कोटी इतका महाप्रचंड होतो. या आकड्याचे अर्थव्यवस्थेत किती सकारात्मक पडसाद उमटले हे माहीत नाही, परंतु अलिकडे उद्योग क्षेत्रातून सकारात्मक बातम्या येऊ लागल्या आहेत. ही चांगली बाब आहे. अर्थात सर्व उद्योगांना हा फायदा मिळतो असे नाही.

दसरा ते दिवाळी या दिवसांत मागच्या वर्षी इतक्याच गाड्या विकल्या गेल्या किंवा मागच्या वर्षी इतकेच मोबाईल आणि फ्रीज व इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या गेल्या. ही बातमी सुखावून जात असली तरी तो अर्थव्यवस्थेचा अत्यंत छोटा हिस्सा आहे, बहुसंख्य नागरिकांच्या आयुष्यात तर अजिबात महत्वाचा नाही. आर्थिक योजना आकड्याने कितीही मोठी असली तरी लोकांच्या हातात जास्त पैसा आला तरच त्यांची विविध गोष्टींची मागणी वाढेल. ती  वाढली की पुरवठा वाढेल. मगच अर्थव्यवस्था सुधारेल. सध्या पुरवठाही कमी आहे, कारण त्याची निर्मिती कमी आहे, अन्यथा यंदा फ्रीज विक्रीच्या संख्येत खूप वाढ झाली असती, हे मुंबईतील एका विक्रेत्याचे उदगार महत्वाचे आहेत. असे सगळे एकात एक अडकले आहे. ते सगळे जागेवर यायला किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे.

दिवाळी झाल्यावर नाताळ सोडला तर पुढचे काही महिने कोणतेही मोठे सण नाहीत. त्यामुळे अर्थव्यवस्था जागेवर येण्यात अडथळे येऊ शकतात. म्हणूनच मागच्या नऊ महिन्यांइतकेच पुढील नऊ महिनेही महत्वाचे आहेत. कोरोना लस कधी येणार आणि आली तरी प्रत्येक नागरिकांपर्यंत कधी पोचणार हाही प्रश्नच आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्याला काही संकल्प करायचे असलेच तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. आता हळूहळू सगळ्या गोष्टी सुरु होत आहेत.

उद्यापासून महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे सुरु करायला मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिली आहे. राज्याला दिलेली ही दिवाळी भेटच म्हणायची. मंजुरी दिली तर सगळे लोक एकदम गर्दी करतील अशी भीती मला गैरलागू वाटते. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात झालेली गर्दी पाहूनही मी हे मत व्यक्त करीत आहे. याचे कारण बहुतांश माणसांना स्वतःला जपण्याचे भान या काळात आले आहे, असे वाटते. मास्क न घालता रस्त्यावरून फिरणाऱ्याना होणाऱ्या दंडाची रक्कम पाहिली की निदान त्या जरबेपोटी तरी ते मास्क घालतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

मनुष्याचा स्वभाव आशादायी आहे हीच तर आपली जमेची मोठी बाजू आहे. तसे नसते तर सध्याच्या आर्थिक / आरोग्यासंदर्भातल्या संकटात आपण टिकून राहू शकलो नसतो. या परिस्थितीला सामोरे न जाण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध नव्हता हे खरे असले तरी, ”ही परिस्थिती सुधारेल, सारे सुरळीत होईल,” ही आशाच तर आपल्याला जागवत असते, धीर देत असते. मराठी माणूस उत्सवप्रिय असतो. कोणताही सण असला या मराठी माणसाचा उत्साह बघण्यासारखा असतो. तरीही गेल्या नऊ महिन्यातले सण हा माणूस साजरे करू शकला नाही. वेगवेगळ्या भागांत दहीहंडीचे थर लागले नाहीत, ‘गोविंदा रे गोपाळा”चे आवाज घुमले नाहीत. गणपती मूर्तींची उंची कमी झाली (हे मात्र चांगले झाले), समोरची गर्दी कमी झाली, रस्त्यारस्त्यावरचे मंडप दिसले नाहीत आणि प्रचंड मोठ्या संख्येने होणारा ‘गणपती बाप्पा मोरया ”चा गजरही झाला नाही.

घरगुती गणपती मात्र आणले गेले आणि गणरायांना विराजमान केले गेले, साग्रसंगीत पूजा झाली आणि घरटी चार माणसांच्या उपस्थितीचे निर्बंध पाळून गणरायाला निरोपही देण्यात आला. दसराही तसा शांतच गेला. दिवाळी येईपर्यंत कोरोना निर्बंध तसे शिथिल झालेले होते, त्यामुळे सर्वांची उत्सवप्रियता पुन्हा जागी झाली आणि ते मोठ्या संख्येने बाहेर पडले. याचे परिणाम कदाचित १५ दिवसांनी दिसतीलाही. ते फार भयंकर नसतील एवढी आशा आपण करू या.

गेल्या काही महिन्यांत राज्यावर नैसर्गिक वादळ, अतिवृष्टी यामुळे आधीच खचून गेलेला शेतकरी आणखी खचून गेला. त्याला उभे करण्याची तातडीची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे मदत पोहचते का हे पाहण्याची गरज आहे. बंद पडलेले लघु किंवा मध्यम क्षमतेचे उद्योग पुन्हा उभारून रोजगार निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. आर्थिक, सामाजिक आव्हाने कमी नाहीत. परंतु दीपावलीत उजळून गेलेल्या दिव्यांचा प्रकाश या सगळ्यांच्या आयुष्यात लख्ख प्रकाश पाडो, एवढीच इच्छा !

या आशादायी विचारांसह … आपण सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साप्ताहिक राशिभविष्य – १५  ते २२ नोव्हेंबर

Next Post

स्वागत दिवाळी अंकाचे – व्यासपीठ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्या उद्घाटन…केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, मंत्री भुजबळ, महाजन यांची विशेष उपस्थिती

सप्टेंबर 9, 2025
NMC Nashik 1
स्थानिक बातम्या

नाशिक महानगरपालिकेत प्रभाग रचनेवरील ९१ हरकतीवर सुनावणी संपन्न…

सप्टेंबर 9, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
संमिश्र वार्ता

नेपाळसारखी दुर्घटना कोणत्याही देशात घडू शकते! सावध राहा!…संजय राऊत यांचे ट्विट

सप्टेंबर 9, 2025
bhujbal 11
संमिश्र वार्ता

छगन भुजबळांची नाराजी कायम…मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले हे पत्र

सप्टेंबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

घर गहाण प्रकरणात दहा लाखाला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 9, 2025
Next Post
2020 11 13 10 41 Office Lens scaled

स्वागत दिवाळी अंकाचे - व्यासपीठ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011