शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – तरंग – अहमदाबादचा धडा 

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 28, 2021 | 1:04 am
in इतर
0
EvEwEmbU4AAlVn0

अहमदाबादचा धडा 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी दोन पूर्ण दिवसही चालली नाही. भारताने या कसोटीत विजय मिळवला असला आणि ती बाब कितीही सुखावह असली तरी अशा प्रकारच्या दिवस-रात्र कसोटी खेळवायच्या का यावर विचार व्हायला हवा.
IMG 20200829 WA0014
अशोक पानवलकर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
ashok.panvalkar@gmail.com
अहमदाबाद कसोटीत गुलाबी रंगाचा चेंडू वापरला गेला. त्या चेंडूंबद्दल अनेक भारतीय खेळाडूंनी आक्षेप घेतला आहे, अशी बातमी काल प्रसिद्ध झाली आहे. इंग्लंच्या खेळाडूंनीही आक्षेप घेतला असणे शक्य आहे. एरवी इतक्या कमी वेळात कसोटी संपल्यावर खेळपट्टीला खलनायक ठरविण्यात येते. तसेच याहीवेळी करण्यात आले. पण नंतर लक्ष वळले ते गुलाबी चेंडूंकडे आणि सामन्यांच्या वेळेकडे.
अवघ्या ३८७ धावांत ३० बळी (त्यातील २८ फिरकी गोलंदाजांनी घेतलेले) आणि सामना निकाली ठरला हे आधी कोणीच अपेक्षित धरले नव्हते. रोहित शर्माने नंतर, ‘खेळपट्टीचा दोष देऊ नका, ती खेळण्याच्या लायकीची होती,” असे म्हटले आहे. लाल चेंडू नेहेमी वापरला जातो, पण त्याला सामोरे जाताना काही प्रश्न येत नाही. गुलाबी चेंडू मात्र एकदम वेगाने येतो, चेंडू वळला नाही तरी सरळ आलेल्या चेंडूने फलंदाज LBW  होतो.
३० पैकी २१ फलंदाज अशा सरळ आलेल्या चेंडूने फसले व बाद झाले असा ट्विट केविन पीटरसन या इंग्लंडच्या माजी खेळाडूने केला आहे. या सगळ्यांमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन भरपूर झाले हा भाग वेगळा, पण क्रिकेटचे भले झाले या या प्रश्नावर भाला मोठा नकार द्यावा लागेल.
मुळात अशा दिवसरात्र कसोटी खेळविण्याची गरज का भासली? गेल्या काही वर्षांत क्रिकेट पार बदलले. कसोटी खेळताना प्रत्येक खेळाडूचा कस लागत असतो. कसोटी हेच खरे क्रिकेट असे म्हटले जाते ते बरोबर आहे. परंतु हा सारा खेळ पैशांभोवती फिरतो. तिकीटविक्री, स्टेडियममधील जाहिराती, टीव्ही प्रक्षेपण हक्क, विविध कंपन्यांची स्पॉन्सरशिप, तो पैसे वसूल करण्यासाठी टीव्ही चॅनेलवर जाहिरातींचा मारा हा सगळा खेळ कोट्यवधी रुपयांचा आहे. हा आकडा आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. कित्येक हजार कोटींचा आहे.

ERI8XHRWsAEefEZ

प्रेक्षक येत नसतील तर किंवा कसोटी दोन-तीन दिवसांत संपली तर या कंपन्यांना प्रचंड तोटा होतो. अहमदाबाद कसोटी दोन दिवसात संपल्याने उरलेल्या तीन दिवसांचा जाहिरातीचा महसूल बुडाला, टीव्ही चॅनेलचेही नुकसान झाले. इथे खेळ दुय्यम ठरतो, पैसा महत्वाचा आहे. हे इतर कोणत्याही खेळाबद्दल म्हणता येत नाही, क्रिकेटबद्दल मात्र हमखास म्हणता येते.
असा हा खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांना म्हणे पाच दिवसाची कसोटी ‘कंटाळवाणी ‘ वाटू लागल्याने ते मैदानात येईनासे झाले. प्रेक्षकसंख्या रोडावू लागल्याने ‘कंटाळवाणे ‘ सामने टाळून झटपट सामने खेळविण्याचा विचार झाला, त्यालाही आता दोन दशके होऊन गेली.
एक दिवसीय क्रिकेट लोकप्रिय झाले. कारण सकाळी सामना सुरु झाला की संध्याकाळी निकाल ठरलेला. कालांतराने हेही क्रिकेट कंटाळवाणे झाले आणि टी-२० सामन्यांचा उदय झाला. इथे तर अवघ्या तीन तासांत निकाल लागतो. हे लोकप्रिय होते आहे हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात आल्यावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जन्माला आली.
खेळाडूंचे लिलाव व्हायला लागले, आणि आपला लिलाव होतो आहे यावर खेळाडूही  खुश व्हायला लागले. कारण कल्पनेपलीकडचा पैसे अत्यंत कमी वेळात खात्यांमध्ये येऊ लागला, जाहिरातींमुळे क्रिकेटपटू दिवसरात्र घरांघरांमध्ये पोचले आणि त्यांच्या बँक खात्यांमध्ये धावांपेक्षाही वेगाने वाढ व्हायला लागली. या सगळ्यामध्ये क्रिकेट या ‘gentleman’s Game चे काय झाले? हा विचार कोणीच करत नाही.

EuQmYl6VIAI 2 z

यात प्रश्न खेळाडू पैशाने गब्बर झाले हा नाही. तुम्ही आम्ही नोकरी करून पैसे मिळवतो, क्रिकेट खेळणे हे क्रिकेटपटूंचे उपजीविकेचे साधन आहे, ते अल्पावधीत गब्बर झाले तर कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही, असा युक्तिवाद यावर केला जाईल. तो बरोबरही आहे. परंतु शेवटी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पैसा आणि खेळाचा दर्जा यात समतोल साधायचा की नाही हा खरा प्रश्न आहे.
सचिन, द्रविड, विराट, धोनी यांसारख्या खेळाडूंची कारकीर्द प्रदीर्घ असल्याने आर्थिक लाभही मोठे असतात. परंतु त्यासाठी त्यांना स्वतःचा दर्जाही टिकवून ठेवावा लागतो, त्यासाठी अपार परिश्रम घ्यावे लागतात आणि त्यांना मिळणारे अफाट पैसा  हा त्याची किंमत म्हणून घेतला जातो, हे समजून घेतलेच पाहिजे.  परंतु हे भाग्य फार थोड्या खेळाडूंच्या वाट्याला येते. बहुसंख्य लोकांची क्रिकेट कारकीर्द एवढी प्रदीर्घ नसते, त्यामुळे कमी काळात जास्तीत जास्त पैसे हा क्रिकेटचा सर्वात मोठा फायदा आहे, हे मान्य करायला हवे.
क्रिकेटपटूंची कमाई हा इथे दुय्यम विषय आहे असे गृहीत धरले तर  मग मुख्य मुद्दा काय?  या पैशाच्या खेळात क्रिकेटच्या दर्जावर परिणाम झाला का हा तो विषय. तो परिणाम निश्चित झाला. तो सुखावह नव्हता. आयपीएलमध्ये काही दिवसांपूर्वीच काही क्रिकेटपटुंवर जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यावर टीकाही झाली. ती स्वाभाविक होती. इतके पैसे एखाद्या भारतीय खेळाला मिळाले तर या खेळणं उर्जितावस्था प्राप्त होईल. वस्तुस्थिती तशी नाही.
गेले वर्षभर कोरोनामुळे मैदानात शुकशुकाट होता. क्रिकेट , फुटबॉल यांचे सामने झाले, पण प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत. आता प्रेक्षकांना परवानगी मिळाली आहे. अहमदाबादमधल्या कसोटीत प्रेक्षकांची गर्दी पाहून गुजरातमधून कोरोनाने  काढता पाय घेतला असावा असा समज कोणाचाही होऊ शकतो. मधल्या मध्ये या कोरोनाने रणजी स्पर्धेचा बळी घेतला आणि एक दिवसीय विजय हजारे चषक महत्वाचा ठरला. रणजी स्पर्धा हा कोणत्याही क्रिकेटपटूंचा भारतीय संघात प्रवेश करण्यासाठीचा पहिला व अत्यंत महत्वाचा टप्पा ठरतो.

EuF3NBEU0AAS1gf

कोरोनामुळे प्रत्येक राज्यात जैवसुरक्षा असलेले (बायोबबल) वातावरण निर्माण करून खेळाडूंना त्यात ठेवता येणार नाही, असे कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिले. ते कारण समजण्यासारखे असले तरी रणजी स्पर्धा रद्द होणे यासारखे दुर्दैव दुसरे नाही. पाय डळमळीत झाला तर पुढे काय होणार हा प्रश्नच आहे. आणि याच पार्श्वभूमीवर दिवस रात्र कसोटीचा अट्टाहास व दोन दिवसात संपलेली कसोटी हा ‘न्याय ‘ कोणता म्हणायचा?
अहमदाबाद कसोटीवर अजूनही टीका होत आहे. चौथी  कासोटीही अहमदाबादलाच खेळविली जाणार आहे. पुढील टी ट्वेंटी सामनेही अहमदाबादलाच आहेत. त्यासाठीच तर एवढे मोठे स्टेडियम उभारून त्याचे उद्घाटन करण्यात आले. एक दिवसीय सामने पुण्याला होणार आहेत. इंग्लंड संघाला कोरोनामुळे फार शहरांत जावे लागू नये म्हणून असे करण्यात आले आहे. ते समजण्यासारखे आहे. परंतु तिसऱ्या कसोटीतून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ काही धडे घेईल अशी अपेक्षा करायची का?
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साप्ताहिक राशिभविष्य – २८ फेब्रुवारी ते ७ मार्च

Next Post

तयार रहा! लवकरच येताय हे चित्रपट…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

तयार रहा! लवकरच येताय हे चित्रपट...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

भारतीय रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या ३८० विक्रमी फेऱ्या चालवणार

ऑगस्ट 22, 2025
IMG 20250820 WA0222 1

आज रेखाताई नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणार आम्ही मराठी नृत्याविष्कार…तीन दिवस रंगणार महोत्सव

ऑगस्ट 22, 2025
image002MFJ9

संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित…दोन्ही सभागृहात केली १५ विधेयके मंजूर

ऑगस्ट 22, 2025
Untitled 36

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू होणार…मिशन शक्ती अंतर्गत मान्यता

ऑगस्ट 22, 2025
Untitled e1755825318843

जळगावमध्ये ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात कबीर मठातील महंत प्रियरंजनदास जागीच ठार…सतंप्त नागरिकांचा रास्ता रोको

ऑगस्ट 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नियोजित कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता, जाणून घ्या,शुक्रवार, २२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011