बुधवार, नोव्हेंबर 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – ऑर्डर ऑर्डर – स्थगिती आणि अधिकार

जानेवारी 14, 2021 | 5:29 am
in इतर
0
SC2B1

स्थगिती आणि अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे. विविध प्रकारच्या प्रक्रिया पार पडून संसदेत संमत झालेल्या कायद्यांना स्थगिती दिली जाऊ शकते का किंवा कायदे रद्द केले जाऊ शकतात का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. त्याची उकल करणारा हा लेख…

देविदास शेळके
अ‍ॅड देविदास शेळके
मो. 8149903823
[email protected]

सध्या देशात सर्वात वादग्रस्त ठरलेल्या कृषी विधेयकांवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणामधले शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही वादग्रस्त कायदे रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, बहुमताचा जोर असलेले केंद्र सरकार देखील इंचभर देखील मागे फिरण्यास तयार नाही. अर्थात केंद्र सरकारने काही तरतूदींमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, शेतक-यांची भूमिका अशी आहे की, कायद्याचे मूळ किंवा त्यांचा हेतूच मूळ शेतक-यांच्या हितावरच थेट घाला घालणारे असल्याने ते कायदेच नको; त्यामुळे कायद्यांमध्ये सुधारणा वगैरे हा गोष्टींना काहीही अर्थ नाही.

दोन्ही बाजू त्यांच्या भूमिकेवर अगदी ठाम असल्याने या प्रकरणाची कोंडी फुटण्याची कोणतीही चिन्हे दृष्टीपथात नव्हती. केंद्र सरकारने आतापर्यंत आंदोलन उधळण्यासाठीचे सर्व हत्यार आणि तंत्र या आंदोलनामध्येही वापरले. त्यानंतर देखील आंदोलनाचा जोर तसूभरही कमी झाला नसल्याने ही कोंडी अधिकच तीव्र होत चालल्याची चिन्हे होती. त्यातच सर्वोच्च न्यायालयात सोमवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. शेतकरी कायद्यांविरोधात दाखल याचिकांवर न्यायालयात सुनावणी झाली. या कायद्यांवर स्थगिती दिली जाऊ शकते, असे सुतोवाच सर्वोच्च न्यायालयाने केले. त्यानंतर मंगळवारी त्या कायद्यांवर स्थगितीही देण्यात आली. तसेच, या कायद्यांसंदर्भात एक समिती नेमण्याची शिफारस करण्यात आली. त्या समितीमध्ये सर्व सरकारधार्जिण्या लोकांचीच नियुक्ती करण्यात आल्याचा आंदोलकांनी आरोप केला. त्यानंतर एकूणच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या स्थगिती प्रकरणी मोठ्या प्रमाणात उलटसूलट चर्चा सुरू झाली. समाजमाध्यमात तर या विरोधात अतिशय टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या. शेतकरी आंदोलनातली हवा काढून घेण्यासाठीच हे स्थगिती प्रकरण घडवून आणण्यात आले आहे आणि केंद्र सरकारच या सर्व प्रकरणाचा कर्ता करविता आहे, असा ब-यापैकी त्या चर्चेचा सूर होता. अर्थात हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे.

court 1

मात्र, कायद्याच्या दृष्टीकोनातून जर न्यायालयीन अधिकाराचा विचार करायचा ठरल्यास विधीमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र आहे. तिन्ही सर्वोच्च संस्था एकमेकांवर चेक आणि बॅलन्सची भूमिका बजावतात. त्यामुळे संसदेने अथवा कोणत्याही राज्याच्या विधानसभेने कोणताही कायदा केला की जो नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अतिक्रमण करतो आणि विधीमंडळाला जर तशा स्वरुपाचा कायदा करण्याचे अधिकारच (लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स) नसेल तर या दोन्ही कारणामुळे न्यायपालिकेला असा कायदा अथवा कायदे घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार आहे.

१९७३ मध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. संसदेला असा कोणताही कायदा करण्याचा अधिकार नाही की ज्यामुळे घटनेच्या मूळ गाभ्याला हात लावला जाऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार हे घटनेच्या मूळ गाभ्याचा भाग असल्यामुळे त्यावर अतिक्रमण करणार कायदा हा घटनेच्या मूळ गाभ्यावर घाला घालणारा कायदा असेल आणि त्यामुळे असा कायदा घटनाबाह्य ठरेल, असा ही निवाडा या प्रकरणात दिला. अर्थात घटनेचा कोणता भाग हा घटनेचा मूळ गाभा आहे, असे जरी सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेले नसले तरी ‘मूलभूत अधिकार’ राज्याची दिशादर्शक तत्वे, धर्मनिरपेक्षता, राज्याच्या तीन सर्वोच्च संस्थामधील अधिकाराच्या विभागणीचे तत्व (सेपरेशन ऑफ पावर) हे घटनेचा मूळ गाभा आहे असे सर्वोच्च न्यायालयाने निवाडे दिले आहेत. तसेच प्रकरणागणिक आणि ज्या प्रकरणात घटनेचा ‘मूळ गाभा’ याचा संबंध येतो त्याठिकाणी ‘असा भाग’ घटनेचा मूळ गाभा आहे, का याचा सर्वोच्च न्यायालय अर्थ लावत असते.

त्यामुळे जे कायदे अथवा धोरणं हे घटनेच्या मूळ गाभ्याला हात घालत असतील ते सर्व कायदे अथवा धोरणं हे घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार न्यायपालिकेला म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला घटनेमध्ये देण्यात आला आहे. याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. त्यामुळेच न्यायालयाने दिलेली स्थगिती ही योग्य की अयोग्य हा प्रश्नच निकाली निघतो आहे.

(लेखक हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली करतात.)

सदर लेखमाला

वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – श्यामचे पोहणे – आईचा उपदेश

Next Post

उस्मानाबाद नव्हे धाराशिव? नामांतराचा आणखी एक मुद्दा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
ErnXKU6VoAMJTG7

उस्मानाबाद नव्हे धाराशिव? नामांतराचा आणखी एक मुद्दा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011