मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्मनिर्भर भारताचा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा

by India Darpan
जुलै 27, 2020 | 10:42 am
in इतर
0
devendra fadnavis

विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करा, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या बैठकीचा समारोप करताना फडणवीस बोलत होते. मा.फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला समर्थ नेतृत्व मिळाले आहे. चीनने लडाख सीमेवर केलेल्या घुसखोरीला आक्रमक उत्तर देऊन नरेंद्र मोदी यांनी सध्याचा भारत १९६२ चा भारत नाही, हे दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प जाहीर केला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

राज्यातील कोरोना फैलावामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यात आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवा अशी सूचना वारंवार करूनही हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या या नाकर्त्या कारभाराचा फटका जनतेला बसत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. मा. फडणवीस पुढे म्हणाले की, लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आघाडी सरकार कुचराई करत आहे. बारा बलुतेदार वर्गाला आघाडी सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजमधून केंद्र सरकारने मोठी मदत करूनही आघाडी सरकार आपले अपयश झाकण्यासाठी केंद्रावर दोषारोप करत आहे. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करेपर्यंत भाजपाचे आंदोलन चालूच राहील. १ ऑगस्ट रोजी होणारे दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठीचे आंदोलन पूर्णपणे अहिंसक स्वरूपात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वीरजवान वाघ यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

Next Post

कोरोनाच्या काळात अधिका-यांनी केलेले कार्य अभिनंदनीय

Next Post
RRR 3194

कोरोनाच्या काळात अधिका-यांनी केलेले कार्य अभिनंदनीय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011