बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आज देशभरातील शेतकरी संघटनेचा शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन

नोव्हेंबर 26, 2020 | 5:46 am
in राष्ट्रीय
0
kisan

नवी दिल्ली – मोदी सरकारने पारित केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्याविरोधात  २६ व २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली घेराव हे देशभरातील ५०० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांचे आंदोलन दिल्ली येथे होत आहे. राष्ट्रीय किसान महासंघ व अखिल भारतीय किसान समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किसान मोर्चा या फोरमची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान क्रांती, बळीराजा शेतकरी संघटना या संघटना देखील राष्ट्रीय किसान मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड, जळगाव येथील चारशे शेतकऱ्यांचा जत्था सचखंड एक्सप्रेसने कालच दिल्ली येथे पोहोचला आहे. या शेतकऱ्यांची राहण्याची व्यवस्था मजनू का टीला गुरूद्वारा, काश्मीरी गेट येथे करण्यात आली आहे.

या आंदोलना संदर्भात माहिती देताना राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक संदीप आबा गिड्डे-पाटील यांनी सांगितले की नवीन शेतकरी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून बनवण्यात आले असून यामुळे देशभरातील अन्नदाता शेतकऱी देशोधडीला लागणार  आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असल्यामुळेच जागतिक मंदी तसेच कोरोना यासारख्या जागतिक संकटांनी देखील भारताची अर्थव्यवस्था तरली आहे. मात्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या पायावर कुर्‍हाड मारल्यामुळे देशातील शेतकरी नष्ट होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी, शेती आधारित उद्योग व अर्थव्यवस्थेवरदेखील दुरगामी परिणाम होणार आहे.

या कायद्यामुळे किमान आधारभूत किंमतीची संकल्पनाच नष्ट होत असून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून देखील विस्थापित शेतकऱ्यांची शेती कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव खेळला जात आहे.
याशिवाय अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये बदल करून शेतकरी हित दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. याचे लेटेस्ट उदाहरण घ्यायचे झाले तर कांदा निर्यातीवरील बंदी ज्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे.

हे शेतकरी कायदे जोपर्यंत रद्द होत नाहीत तोपर्यंत आम्ही दिल्ली सोडणार नाही,  असं राष्ट्रीय किसान मोर्चा नियोजन आहे. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पंजाब, हरियाणा, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातून चारशे शेतकऱ्यांचा जत्था आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचला आहे.
दिल्ली येथे या आंदोलनाचे गेल्या तीन महिन्यापासून नियोजन सुरू असल्याचं शंकर दरेकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय पातळीवरील श्री शिव कुमार शर्मा, व्ही एम सिंग, योगेंद्र यादव, जगजीत सिंग डल्लेवाल, गुरनाम चंढुनी, बलबीर सिंग राजेवाल,  संतवीर सिंग, अभिमन्यू कोहाड, केवी बिजु, लक्ष्मण वंगे यांची समिती कार्यरत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संपातील किसान क्रांतीचे संदीप गिड्डे आंदोलन समन्वय पाहत आहेत. राष्ट्रीय किसान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नियोजन पाहत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा आहे संविधान दिनाचा इतिहास

Next Post

अक्षर कविता – शैलजा कारंडे यांच्या ‘बाभूळबन’ या कवितेचे अक्षरचित्र

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
IMG 20201112 WA0025

अक्षर कविता - शैलजा कारंडे यांच्या 'बाभूळबन' या कवितेचे अक्षरचित्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011