नवी दिल्ली – बरोबर ९० वर्षापूर्वी १३ फेबुवारी १९३१ मध्ये राजधानी नवी दिल्लीचा उद्घाटन समारंभ झाला. त्यापुर्वी १९११ मध्ये दिल्लीत एक दरबार भरला त्याला सिक्कीमपासून ते बर्मापर्यंतचे राजे, महाराजे, राजपुत्र, हैदराबादचा निजाम आणि भोपाळ संस्थानमधील बेगम यांनी समारंभात हजेरी लावली होती. याप्रसंगी हजारोंच्या जमावासमोर ब्रिटीश सम्राट जॉर्ज पंचम यांनी भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा केली.
नवीन राजधानी तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यानंतर एक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आजूबाजूची सुमारे पंचवीस-तीस गावे येथे आणून तांबू नगरीत रूपांतरित झाली आणि त्याकरिता सुविधा उभारण्यात आल्या. त्या वेळी ८५ एकरवर सम्राट जॉर्ज (पाचवे ) यांच्या कल्पनारम्य आकारातील शहर तयार करणे, पुनर्वसन आणि सुशोभित करणे हे एक आव्हान आहे, परंतु राजधानीचे निर्माते लुटियन्स यांनी त्यांच्या कल्पनांना सुंदर आकार देऊन सुमारे २० वर्षात नवी दिल्ली उभारली.










