सोमवार, ऑगस्ट 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त; जाणून घ्या पंचांगकर्ते दा कृ सोमण यांच्याकडून

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 16, 2020 | 1:28 pm
in मुख्य बातमी
0

देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुर्गादेवीची नवरात्रात पूजाअर्चा, उपवास, नामस्मरण केले जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा नवरात्रोत्सव करण्यावर मर्यादा आल्या असून तो साधेपणानेच साजरा करावा. गर्दी न करता कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छता याबाबत काळजी घ्यायला हवी. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव घरच्याघरी आरोग्यदायी साजरा करूया.
दा कृ सोमण
दा. कृ. सोमण पंचांगकर्ता व खगोल अभ्यासक
शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. शनिवार दि. 17 आॅक्टोबर हा घटस्थापनेचा संपूर्ण दिवस चांगला आहे. तरी सूर्योदयापासून दुपारी 2 वाजेपर्यंत कधीही घटस्थापना करावी. यावर्षी कोरोना लढाईकाळात नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव आला आहे. दुर्गा म्हणजे शक्ती. माणसात प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आरोग्य चांगले राहते. म्हणून या वर्षी नवरात्रात आरोग्यदेवीची उपासना करणे योग्य होईल.  आरोग्य विषयक सर्व नियमांचे शिस्तीचे पालन करणे हीच खरी दुर्गापूजा होईल. यंदाच्या नवरात्राचा आरोग्याशी निगडीत दृष्टीकोन असायला हवा. हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे सणांचे व शेतीचे वेळापत्रक यांचे नाते आहे. ठराविक सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी पंचांगात सौर व चांद्र पद्धतीचा मेळ घातलेला आहे. ऋतूप्रमाणे आहार घेतला की शरीराचे आरोग्य चांगले राहते. म्हणून श्रावण महिना पावसाळ्यात येतो. उपवास केल्याने शरीराचे आरोग्य चांगले राहते. दिवाळी थंडीत येते. तेल-तुपाचे पदार्थ खातो . नवरात्रात शेतातील धान्य घरात येते. म्हणून नवरात्रात आपण निर्मिती शक्तीची पूजा करतो. उत्सवांमध्ये माणसे एकत्र आल्याने मनाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच आपले सण आरोग्यदायी आहेत.
स्तोत्रपठण
सर्वच स्तोत्रे व्याधी बरी करणारी आहेत. स्तोत्रपठण केल्याने मनाच्या व्याधी दूर होतात. विश्वास, निर्भयता प्राप्त होते. मनोबल वाढते. अनेकवेळा मनाच्या व्याधी दूर झाल्या की शरीराच्या व्याधी दूर होतात.  कुठलही स्तोत्र म्हणताना ते शुद्ध असायला हवे, त्याचे उच्चार स्पष्ट असायला हवेत आणि एकाग्रतेने म्हणायला हवे, तरच ते स्तोत्र फलदायी ठरतं, स्तोत्राने शारीरीक आरोग्य चांगले होत नाही. मानसिक आरोग्य चांगले होते आणि मानसिक आरोग्य चांगले असल्यास त्याचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. मानसिक आरोग्यासाठी स्तोत्र असतात. तुम्ही नुसतं स्तोत्र म्हंटल आणि दारू प्यायली तर आरोग्य चांगले राहणार नाही. म्हणजे व्यसन केले तर आरोग्य चांगले राहणार नाही. म्हणून आरोग्य हे शरीरात औषध न घेता स्तोत्र म्हणून बरे होणार नाही. मनाला एकाग्रता येते, शांतता मिळते, समाधान वाटते. स्तोत्र म्हणजे देवाची स्तुती आणि प्रार्थना असते. देवाशी आपण लीन होतो.  ती प्रार्थना केली की मनमोकळं होतं.  मनात चिंता असते, काळजी असते, दु:ख असते हे सगळं मनातलं जसं झाडून आपण कचरा काढतो तसे ते निघून जाते, ते तसं केल्यावर आपलं मन शुद्ध होतं. प्रार्थना केल्यावर आणि स्तोत्र म्हंटल्यावर म्हणजे मन स्वच्छ झाल्यावर त्याचा परिणाम शरीरावर होतो. अनेक महिला विशेषता अशी आहे की त्या मनाने आजारी असतात काहीतरी होतयं असं सातत्याने त्यांना वाटत राहत आणि हे असे वाटत राहणं म्हणजे मग शरीर आजारी पडतं. म्हणून घरात मनमोकळं करायला संवाद पाहिजे. घरात संवाद होत असेल तर मनाचे आरोग्य चांगले राहते. दुसरी गोष्ट म्हणजे घरात स्तोत्र म्हंटल्यावर मुलांवरती चांगले संस्कार होतात. मुलं घरात व्यसन करून येत नाहीत. आई-वडिलांना उलट उत्तर देत नाहीत, घरात देव असतात त्यामुळे मुलं नम्र होतात, आदर निर्माण होतो. मुलांवरती चांगले संस्कार होतात. म्हणून घरात पूजा करणे किंवा स्तोत्र म्हणण केवळ आपल्यासाठी नसतं, घरात ज्येष्ठ आई-बाबा असतील तर त्यांनाही बरं वाटतं, त्यांना त्याचं महत्व जास्त असतं, म्हणून तरूणांनी स्वत:च्या आणि इतरांच्या मानसिक समाधानासाठी स्तोत्र म्हणायचे. कोणतेही स्तोत्र मनापासून , एकाग्रतेने,शुद्ध उच्चारात म्हणावे. अनेक लोक दररोज मारूतीस्तोत्र किंवा श्रीरामरक्षा म्हणतात. यामध्ये काहीजण मारूती स्तोत्र म्हणतात जे मराठीमध्ये आहे काहीजण रामरक्षा म्हणतात जी संस्कृतमध्ये आहे आणि जर स्तोत्राचा अर्थ समजून म्हंटल की त्याचे जास्त समाधान आपल्याला मिळते.
यंदा असे करा
कोरोनाचे संकट हे विश्वव्यापी आहे. ‘ माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा मंत्र लक्षात ठेवायला हवा. स्वच्छता पाळा, गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टंसिंगची काळजी घ्या.  आजकाल आॅनलाईनवर सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळत असल्याने पूजेला लागणारे साहित्य आॅनलाईन मागवू शकता. शक्य नसल्यास केवळ अक्षता अर्पण केल्या तरी हरकत नाही. देवीची मनोभावे उपासना करा. दुसरी गोष्ट म्हणजे यंदा या संकटामुळे कोणाला आपण घरी बोलावू शकत नाही अशावेळी आॅनलाईन अॅपद्वारे देवीचे दर्शन आप्तेष्ट-मित्रांना घरी न बोलावता द्या. झूम, गुगल अॅप असे बरेच पर्याय आहेत. ज्याच्यामाध्यमातून सगळ्यांना देवीचे दर्शन घेणे शक्य आहे. तसेच घरच्याघरी धातूच्या मूर्तीचे पूजन करा.  घरातील आई, बहिण, पत्नी, सून या देवताच आहेत. घरातील मंदिरातल्या दुर्गेपेक्षा त्या जीवंत देवता आहेत, त्यांचें महत्व जास्त आहे. त्यामुळे देवीच्या पूजेसोबतच घरातल्या महिलांचा आदर करा, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे महत्वाचे. तीच खरी दुर्गापूजा होईल.
आहाराविषयी
खरंतर नऊ दिवसात सर्वांनी उपवास करायलाच हवेत असे शास्त्रात लिहीलेले नाही. शरीरातील मांद्य दूर करण्यासाठी हलका आहार घेणे म्हणजेच उपवास होय. मनाला संयम असावा आणि शरीर शुद्ध होण्यासाठी उपवासाचा हेतू असतो. त्याने शरीर आणि मन हे दोन्ही शुद्ध होते. जेंव्हा शरीर उपवास करून शुद्ध होते तेंव्हा मन सुद्धा शुद्ध होते. त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे नवरात्रात उपवासादरम्यान फळे, पाणी असा आहार घेतात. जो पचायला हलका असतो. त्यामुळे उपवास हा सात्विकता वाढवण्यासाठी केला जातो.  निर्मितीशक्ती आणि 9 अंक यांचे अतूट नाते आहे. बी जमिनीत पेरले की 9 दिवसानी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने 9 दिवसांनी मूल जन्माला येते. त्यामुळे नवरात्रात या नऊ दिवसांना महत्व असते.  देवीने त्या राक्षसाना मारले. पण आपण आपल्या मनातील राक्षसांचा नाश करायला हवा. त्यासाठी आपल्याला स्वतःमधील आळस, अज्ञान,अनारोग्य, अंधश्रद्धा,अनीती या राक्षसांचा आपणच आपल्याला वध करायचा आहे. नाश करायचा.
काळजी काय घ्याल
– नवरात्रोत्सवात स्वच्छता, सोशल डिस्टन्स, मास्क लावणे, शिस्त यांचे पालन करावे.
– बाहेरून आणलेल्या वस्तू स्वच्छ करून त्या वापराव्यात.
– पूजासाहित्यात एखादी वस्तू नसेल तर अक्षता अर्पण कराव्यात.
– आप्तेष्ट मित्रांना घरी न बोलावता ऑनलाइन अॅपवरून दर्शन द्यावे.
– गर्दी न करता नवरात्रोत्सव साधेपणाने, शिस्त व नियम पाळून उत्साहात साजरा करावा.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी – दिव्यांग विद्यार्थ्यांशी गटशिक्षणाधिकारींनी साधला संवाद

Next Post

गिरणा धरणात विष प्रयोग? पाणीपुरवठा थांबवला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201016 131610 scaled

गिरणा धरणात विष प्रयोग? पाणीपुरवठा थांबवला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 07 21 at 8.31.40 PM 1024x537 1

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने चिमुकल्या देवांशीवर यशस्वी शस्त्रक्रिया….

ऑगस्ट 18, 2025
IMG 20250818 WA0341 e1755518236764

गुजराथमधील वनतारा येथे देशभरातील ५४ पशुवैद्यक झाले दाखल…हे आहे कारण

ऑगस्ट 18, 2025
GyoHqaIaEAA9HA9 1920x1749 1 e1755517492732

तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय…या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ऑगस्ट 18, 2025
Gyn5Kq6bkAA2KV6

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातल्या पावसाचा आढावा…मुंबईत १७० मिलिमिटर पाऊस तर मराठवाड्यातल्या ८०० गावांना अतिवृष्टीचा फटका

ऑगस्ट 18, 2025
crime1

वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग…दोघांनी दुचाकीस्वारास केली बेदम मारहाण

ऑगस्ट 18, 2025
crime 112

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले….वेगवेगळया भागात राहणा-या तीन मुली बेपत्ता

ऑगस्ट 18, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011