गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे रब्बीसह फळपिकांना मोठा फटका

फेब्रुवारी 19, 2021 | 2:23 pm
in संमिश्र वार्ता
0
Capture 20

मुंबई –  राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसत आहे.
नाशिक जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे. सर्वाधिक नुकसान द्राक्ष पिकांचं झालं आहे. एकूण 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष जवळपास फेकण्याची वेळ आली आहे. त्या खालोखाल 3 हजार 300 हेक्टर क्षेत्रावरील कांदा आणि अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील गहू आणि हरभऱ्याचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान निफाड, दिंडोरी, सटाणा या तालुक्यात झालं आहे.
गतवर्षी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्याफतला द्राक्ष हंगाम यंदा महिनाभरानं लांबला आहे. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच दोन दिवसांपासून तालुक्यांच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पंढरपूर परिसरात परवा आणि काल अवकाळी पाऊस झाला. कासेगाव, लक्ष्मीटाकळी, खर्डी, कोर्टी, सरकोली परिसरात झालेल्या या पावसामुळे या परिसरातल्या द्राक्ष बागांना फटका बसला आहे.
नंदूरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात काही ठिकाणी काल गारपीटीसह मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या या पावसानं पिकांना मोठा फटका बसणार असून यामुळं शेतकऱ्यांमध्ये चितेचं वातावरण निर्माण झालं आहे.
IMG 20210218 WA0007

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात तडेगाववाडी इथं काल पाऊस सुरू झाल्यानंतर शेतात मका गोळा करत असताना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला.

धुळे जिल्ह्यात काल संध्याकाळी  साक्री तालुक्यात काटवान आणि दहिवेल भागात वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट झाली. पाऊस आणि गारपीटमुळे कांदा, हरभरा आणि गहू पिकाचं नुकसान झालं आहे. आंब्याचे मोहर गळून पडले. तर धुळे तालुक्यात नेरसह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. धुळे शहरातही सायंकाळी साडे सात वाजेनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाला असून गारठा वाढला आहे.

नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून सर्वत्र पाऊस होत आहे. या बेमोसमी पावसामुळे गव्हू, हरभरा, करडई, ज्वारी, कापूस, टरबूज, खरबूज, आंब्यासह भाजीपाला बागांचं मोठं नुकसान झालं आहे. काल किनवट तालूक्यातल्या सिंदखेडा शिवारात एकाज् गुराख्याच्या अंगावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातही सर्वत्र पहाटे पाच वाजल्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गहू, हरभरा, हळद, तुर या पिकांना मोठा फटका बसणार आहे. अनेक भागात हरभऱ्याची काढणी सुरू आहे. हळद काढून वाळायला टाकलेली आहे. अशा परिस्थितीत पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.

IMG 20210218 WA0008

लातूर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या या पावसाचा मोठा फटका तालुक्यातल्या मुरुड, भिसे वाघोली परिसराला बसला आहे. या परिसरात वाऱ्यामुळे गव्हु अडावा झाला आहे. अवकाळी पावसामुळे हरभऱ्याचे घाटे गळुन पडले आहेत, ज्वारी आणि गव्हु आडवा झाला आहे. परभणी जिल्ह्यात पहाटेपासून सकाळपर्यंत मेघ गर्जनेसह रिमझिम पाऊस पडला. तसंच दिवसभर ढगाळ वातावरण होतं. सकाळी ७ वाजेपर्यंत ९ पूर्णांक ६ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या फळाला मोठा तडाखा बसला. तसंच गहू आणि अन्य पिकांनाही तडाखा बसला.
उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागा तसेच रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रब्बी हंगामातल्या ज्वारी हरभरा या पिकांचं, तसंच  कळंब तालुक्यातल्या शिराढोण परिसरात आंबा, मोसंबी, पपई या फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बघा, हिट अँड रनचा व्हिडिओ

Next Post

दिंडोरी तालुक्यात वादळी पावसाने द्राक्षांचे लाखोंचे नुकसान

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
IMG 20210219 WA0078 e1613747330663

दिंडोरी तालुक्यात वादळी पावसाने द्राक्षांचे लाखोंचे नुकसान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011