मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६० हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३५ हजार ०८६ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २५ कोटी ३३ लाख २८ हजार २१४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. याच काळात राज्यात ९६ हजार १६४ वाहने जप्त करण्यात आली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते १८ सप्टेंबर या कालावधीत
- पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३५८ (८९४ व्यक्ती ताब्यात)
- १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ६९
- अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७
- जप्त केलेली वाहने – ९६,१६४
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – १९५ पोलीस व २२ अधिकारी