डॉ.राजेंद्र मलोसे , चांदवड
…….
परिचय
डॉ.राजेंद्र मलोसे यांनी औरंगाबादच्या शासकीय विद्यानीकेतन मध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन बाबा आमटे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन चांदवड सारख्या ग्रामीण भागात रुग्णसेवा सुरू केली. सुरुवातीला रचना क्लिनिक आणि आता भव्य रचना हॉस्पिटल असा काळाच्या ओघात बदल झालाही. या बदला सोबत घडत गेला एक चळवळीतला माणूस, जो जेसीस सारख्या सामाजिक चळवळीतून लोकांसाठी काम करीत राहिला. लोकांचे प्रश्न कळत राहिले ,भेडसावत राहिले मग सुरू झाला एका लेखकाचा प्रवास. चांदवडचे ग्रामीण साहित्य संमेलन, शेतकरी संघटनेचे महिला शेतकरी अधिवेशन याने अनेक मोठे लोक,साहित्यिक चांदवडला आलेत या सगळ्यांचा प्रेरणादायी सहवास होताच त्यांच्या सोबत कवी सतीश पिंपळगावकर यांच्या सारखा सच्चा मित्रही होता सोबत. या मित्रानेही डॉक्टरांच्या सर्जनशील हातांना लिहिते केले आणि ‘स्वप्नपंख’ या पहिल्याच पण बहुचर्चित कादंबरीपासून एका जातिवंत लेखकाचा प्रवास सुरु झाला. याच कादंबरीमुळे जेष्ठ लेखक कोसलाकार भालचंद्र नेमाडे,रंगनाथ पठारे,राजन गवस,सुमती लांडे, विनय हार्डीकर, चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा,दिलीप धोंडगे,एकनाथ पगार,प्रकाश होळकर ही माणसं चांदवडला डॉ.राजेंद्र मलोसे यांना येऊन भेटू लागली.चांदवडचं साहित्यिक वातावरण त्यामुळे सुपीक राहिलं. नंतर गाथासप्तपदी (कादंबरी)बखर आणि तुझं माझं घर (कथासंग्रह) तू चालत राहा, मोबाईलपूरण ,नखपुराण ही आरोग्य विषयक पुस्तकेही लिहिली. आहेच वेगळी,रझिया, जगणं.. वाचणं या त्यांच्या आगामी कादंबऱ्या लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. सद्या पुणे विध्यापिठाच्या एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमाठी त्यांच्या कथेचा समावेश केला आहे.अनेक पुरस्कारांचे डॉ.राजेंद्र मलोसे धनी आहेतच ,एक चांगले व्याख्याते म्हणूनही परिचित आहेत. इतकं सारं लिहूनही कविता मात्र खूप कमी त्यांनी लिहिल्या त्यातल्या दोन त्यांच्या कादंबरीच्या मलपृष्ठावरच आहेत. त्यातील ‘स्वप्नपंख’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
– विष्णू थोरे,चांदवड
वा खूप सुंदर विष्णुपंत, अक्षर लेखन अप्रतिमबानी कविता डॉ मलोसेंची सुरेखच आहे
सुंदर!!!????