त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अक्षयतृतीया निमित्त जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद नाशिकमार्फत सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सापतपाली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे प्रशासनाच्या तत्परतेमुळे एका बालविवाहास प्रतिबंध करण्यात आला.
सापतपाली गावात १७ वर्षे ४ महिने वयाच्या बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती प्रशासनास मिळताच ग्रामपंचायत अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. या प्रयत्नांना यश येत कुटुंबीयांनी विवाह थांबवण्यास सहमती दर्शवली.
बालविवाह रोखण्यासाठी
एकात्मिक बालविकास प्रकल्प हरसुल येथील महिला व बालविकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी केलेली कार्यवाही कौतुकास्पद असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.