येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यात अनेक शेतकरी सोयाबीनची लागवड करतात, मात्र सतत पडणाऱ्या पावसाने शेतात चिखल असल्याने सोयाबीन तोडणीला अडचणी येत होत्या. त्यातच तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी धास्तावले पुन्हा पावसाने हजेरी लावला तर पीक हातचे जाईल या भीतीने चिखल तुडवत शेतकरी मजुरांकडून सोयाबीन तोडणी करत घरी नेण्याचा प्रयत्न करीत आहे.