येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा पिकावर बदलत्या वातावरणामुळे रोग पडत असल्याने शेतकरी त्रस्त आहे. येवला तालूक्यातील सातारे येथील शेतकरी दिलीप विठ्ठल गांगुर्डे या शेतक-याने आपल्या ३० गुंठे शेतात लावलेल्या लाल कांद्यावर रोगाचा प्रार्दुभाव झाला. यात कांदा जमिनीतच कुजून जात असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी संपूर्ण लागवड केलेल्या कांदा क्षेत्रावर ट्रॅक्टरने नांगर फिरवला आहे. दोन पैसे हाती पडतील या आशेवर असलेल्या या शेतक-याला मात्र नैसर्गिक वातावरणाचा फटका बसल्याने त्याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.