मुंबई – शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या गुंतवणूकदारांना कोरोनाच्या काळात जबरदस्त परतावा मिळाला आहे. या कंपन्यांमध्ये रियल्टी फर्म अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सचाही समावेश आहे. खरे म्हणजे शेअर बाजार हा जुगार असल्याचे म्हटले जाते. काही वेळा अत्यंत कमी किमतीचा शेअर देखील ग्राहकाला लाखो रुपयांचा नफा मिळवून देऊ शकतो. कारण शेअर बाजारातील गुंतवणूक करून आपणही चांगले पैसे कमवू शकतो. अगदी खूप श्रीमंत बनू शकतो, पण त्यासाठी बाजाराच्या गुंतवणुकीचे काही नियम पाळले पाहीजेत. यामध्येच एका शेअरने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देण्याचे काम केले आहे.
परतावा काय आहे
अरिहंत सुपरस्ट्रक्चरने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. बीएसई निर्देशांकावर या शेअरची किंमत ऑक्टोबर 2020 मध्ये सुमारे 20 रुपये होती, ती देखील वाढून 189 रुपये झाली आहे. मंगळवारी शेअर बाजार बंद होताना कंपनीच्या शेअरची किंमत 174.10 रुपये होती. एका दिवसाच्या तुलनेत त्यात 5.16 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 716.60 कोटी रुपये आहे. या कंपनीने गेल्या एका वर्षात निफ्टी वर सुमारे 51 टक्के परतावा दिला आहे.
रकमेनुसार फायदा
यात जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 8 लाखांच्या पुढे गेली असती. अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स ही एक स्मॉलकॅप रिअल इस्टेट कंपनी असून तिचा मुख्य फोकस परवडणाऱ्या घरांच्या बांधकामावर आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. या कंपनीने आतापर्यंत 10 हजार घरांचे बांधकाम पूर्ण केले असून सुमारे 12 हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. कंपनीने गेल्या दोन दशकात सुमारे 60 प्रकल्पांवर काम केले आहे.