India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विधानपरिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा आयात उमेदवारांवरच पणाला! भाजपसह सर्वांचेच वांधे

India Darpan by India Darpan
January 18, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका येत्या ३० जानेवारीला होत आहेत. या निवडणुकीत खरं तर इच्छुकांमध्ये आणि अपक्षांमध्ये थेट लढत होताना दिसत आहे. पण, त्यामुळेच या निवडणुकीत प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शिक्षण क्षेत्रातील व शिक्षकांच्या समस्यांभवती फिरणारी यंदाची निवडणुक प्रतिष्ठेभवती फिरताना दिसत आहे. नाशिक आणि नागपूरमध्ये महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली. नाशिकला काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला होता. ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. पण तांबे यांनी स्वतः फॉर्म दाखल न करता मुलाला म्हणजेच सत्यजित तांबे यांना अपक्ष उभे केले. पण तोंडघशी पाडल्यामुळे काँग्रेसने सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला. अश्यात भाजप वेगळीच खेळी खेळत आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या शुभांगी पाटील यांना पक्षानेच तिकीट दिले नाही. एवढच नाही तर भाजपने आपला उमेदवारच उभा केला नाही. त्यामुळे भाजपची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले गेले. त्यामुळे नाराज झालेल्या शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि त्यांनी ठाकरे गटाला आश्रय मागितला. अर्थात उद्धव यांनी तसे कुठलेच आश्वासन दिले नसल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

नाशिकच्या अटीवर नागपूरचा निर्णय
नागपूरमध्ये महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. पण राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला. आणि काँग्रेस समर्थित संघटनेचे उमेदवारही रिंगणात आले. त्यामुळे आता नाशिकमध्ये आम्ही सांगू त्या अपक्ष उमेदवाराला समर्थन दिले तर नागपूरची जागा काँग्रेससाठी सोडू, अशी भूमिका शिवसेनेने शेवटच्या क्षणाला घेतली.

‘समन्वय ठेवण्याची जबाबदारी सर्वांची’
महाविकास आघाडीत सुरू असलेल्या गोंधळावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून समन्वय ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येकवेळी शिवसेना माघार घेणार नाही. नाशिकमध्ये जे काही झाले, त्याला काँग्रेसच कारणीभूत आहे, असेही ते म्हणाले.

Vidhan Parishad Election Candidate Political Parties


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – …ही अत्यंत दुर्मिळ बाब

Next Post

मत कसे नोंदवाल? निवडणूक आयोगाच्या सूचना; पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक

Next Post

मत कसे नोंदवाल? निवडणूक आयोगाच्या सूचना; पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group