इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
याची केवळ कल्पनाच केलेली बरी
या जगातील ऐहिक जीवनात सुख भरावे असे वाटत असले, तरी ज्या कारणांनी सुख-निर्मिती होत असते त्या कारणांवर मानवाचा यत्किंचितही ताबा नाही. कारण, सुख-निर्मितीच्या मागे अनेकांच्या आशा, आकांक्षा व कर्मफले उभी असतात. त्यावर माणसाचा ताबा नाही. कदाचित् त्याचा स्वतःवर ताबा असेल व त्या मानाने तो दुसऱ्यांशी जमवून घेऊन शक्य तितके सुखी राहण्याचा प्रयत्न करू शकेल इतकेच. सुख-निर्मितीमागे असंख्य शुद्ध हृदयांचे सत्संकल्प उभे रहावे लागत असतात.
एवढेच कशाला, अत्यंत शुद्ध, सात्त्विक चारित्र्याच्या महात्म्यांनाच इतरांच्या कर्मांची फले भोगून त्यांना वाचवावे लागत असतेंl. महात्म्यांच्या अभावी या जगाची स्थिति किती शोचनीय होईल याची केवळ कल्पनाच केलेली बरी…. असें असले तरी, भगवत्कृपेस पात्र होण्याचे मात्र मानवाच्या हाती पूर्णपणे आहे. प्रत्येक मानव भगवंताच्या कृपेची आराधना निर्वेधपणे करू शकेल.