इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
मनाची शांती टिकविण्यासाठी
कोणत्याही क्षुल्लक बाबतीतील असंतोषाने अंत:करणात एकदा प्रवेश केला म्हणजे त्याचा परिणाम मनावर बराच काळ टिकल्याशिवाय रहात नाही. गोष्ट क्षुल्लक असली तरी असंतोषाची छाया एकंदरच संबंध मनोवृत्तीवर दिवसभर राहते. मोठ्या प्रयत्नाने मनाची शांती टिकवावी लागते. असंतोषाला थारा द्यावयाचाच नाही, असा निश्चय करा व प्रसन्नमुख राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मन स्वच्छ होईल, शंका व रुखरुख नाहीशी होईल. पृथ्वीवर-घरांत, बाहेर, सर्वत्र सहानुभूती स्पंदत असलेली दिसेल. ‘प्रसन्नचित्तता’ हा दैवी गुण आहे.