इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
….हीच दिव्यजीवन साधना आहे
अनेक कठीण कर्तव्ये पार पाडल्याने अथवा मनावर दडपण ठेवून, भावनांच्या मुसक्या बांधून दिवसभराचे व्यवहार सांभाळण्याने आपली साधनेत प्रगती होते, असे मुळीच नाही. उलट, सर्वच प्रसंगी खुल्या दिलाने, मनमोकळेपणाने आपल्या इच्छेला भगवंताच्या इच्छेच्या आधीन ठेवण्याचा अभ्यास हीच दिव्यजीवन साधना आहे.
हे करतांना अर्थात्, मनात कोणतीही आवडनिवड असता कामा नये. कशाचीही अपेक्षा असता कामा नये. किंवा कशामुळेही निराश होता कामा नये. साधीसुधी कामे करतानाही केवळ वर्तमानावर दृष्टि ठेवून बाकी सर्वच गोष्टींचा भार त्या सर्वसमर्थ भगवंतावर सोपवून पूर्ण निश्चित राहण्याचा अभ्यास वाढविला पाहिजे.