विचार पुष्प – अशाच वेळी आपली परीक्षा असते
ईश्वर-सेवेचे व्रत हे एक उच्चतम ध्येय म्हणून समोर ठेवल्यानंतर मधून मधून निराशेचे व निरुत्साहाचे प्रसंग आले असतांना निरुपाय समजून स्वस्थ बसण्यात काय अर्थ? अशाच वेळी आपली परीक्षा होत असते. आपल्याला साहाय्य करणाऱ्या परमेश्वरावर श्रद्धा असेल, तर अशा प्रसंगी अगदी ऐनवेळी, म्हणजे अगदी योग्यवेळी, आचरणासाठी लागणारें बळ व मनोधैर्य प्रदान करून तो आपणांस प्रसंगांतून सुरक्षितपणे व यशस्वी रीतीने कसे बाहेर काढतो हे अनुभवून तर पहा! मात्र नेहमीच जरासे कणखरपणाने वागण्याचा अभ्यास मात्र तुम्ही ठेवला पाहिजे.
संकलित