विचार पुष्प
…असे काहीही घडले तर
तुमच्या प्रकृतीस, मनोधर्मास मानवणारे अथवा न मानवणारे असे काहीही घडले असता आपली वृत्ती कशी असली पाहिजे? घटनेस पेलण्याइतकी जर शक्ती असेल, तर कुरकुर करण्याचें कारणच नाही. समजा घटना तुमच्या सहनशक्तीच्या बाहेर असली, तर कुरकुरून काय होणार? तुम्हाला धक्के देऊन, पराभूत करून झाल्यावर तरी, प्रसंग आला तसा निघूनही जाणारच असतो. पण हे लक्षात ठेवा की, कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याचे धैर्य, शौर्य व सामर्थ्य तुमच्या प्रकृतीत प्रथमपासूनच विद्यमान असते. पण तुम्हीच मनाने स्वतःच स्वतःला हीन दर्जाचे व दुर्बल समजता. प्रसंगाचा विनाकारण बाऊ करून स्वतःस पराभूत करता. आणि अंगच्या शौर्य-धैर्यास पुढेच येऊ देत नाही. ही भूमिका सोडून दिली, तर कोणत्याही प्रसंगांना यशस्वीरीतीनें तुम्ही टक्कर देऊ शकाल.