त्रिपुरारी (कार्तिक) पोर्णिमेचे महत्त्व
- पंडित दिनेश पंत
त्रिपुरारी अर्थात कार्तिक पौर्णिमेला प्रारंभ १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होत आहे. तर, समाप्ती १९ नोव्हेंबर दुपारी २ वाजून २६ मिनिटांनी होत आहे.
भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध याच दिवशी केला होता. त्या विजयाप्रीत्यर्थ त्रिपुरी पौर्णिमा अर्थात देव दिवाळी साजरी केली जाते, अशी पौराणिक मान्यता आहे.
फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान कार्तिक स्वामी यांचे दर्शन घ्यावे, अशीही पौराणिक मान्यता आहे.
तुलसी विवाह समाप्ती देखील कार्तिक पौर्णिमेलाच होते.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्नान, दानधर्म करावा. शिवमंदिरात दर्शन घेऊन बेल अर्पण करावे. तसेच कृष्ण मंदिरात तुलसी पत्र अर्पण करून दर्शन घ्यावे, असा शास्त्रार्थ आहे.
त्रिपुरी वात-
त्रिपुरी पौर्णिमेला सायंकाळी शिवमंदिरात सहस्र दले असलेली कापूस वात म्हणजेच त्रिपुरी वात प्रज्वलित करण्यास विशेष धार्मिक महत्त्व आहे