ठाणे/नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह मुंबई, व ठाणे जिल्ह्यात दमट हवामान संततधार पावसामुळे साथीचे आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, थंडी, ताप, जुलाब यासारखे आजार उद्भवल्याने अनेक जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यातच आता नाशिक व ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. या दोन्ही जिल्ह्यात आतापर्यंत १६ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर ४६६ जणांना लागण झाली आहे. आरोग्य विभागाने याची दखल घेत विविध उपायोजना सुरू केल्या आहेत.
नाशिकमधील सद्यस्थिती
नाशकात स्वाइन फ्लूचा धोका वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या ऑगस्ट महिन्यात म्हणजे गेल्या २० दिवसातच ६४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली. शहरात उपचार घेणाऱ्या ११ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे, तसेच नाशिक महापालिकेच्या जुने नाशिक भागात झाकीर हुसैन रुग्णालयात स्वतंत्र स्वाइन फ्लू कक्ष सुरु करण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचा आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. स्वाइन फ्लू आजारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून सरकारी तसेच खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या नागरिकांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्याची दिसून येत आहे आरोग्य विभागातर्फे देखील नागरिकांना आरोग्य संबंधी मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत.
ठाण्यातील सद्यस्थिती अशी
ठाणे शहरासह जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांत ५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन’चे 402 रुग्ण असून तीन दिवसांत नवे ५२ रुग्ण आहे, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील तीन दिवसांत ५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत पाचने वाढ झाली. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ४०२ वर, तर मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे.
मागील तीन दिवसांत ठाणे महापालिका हद्दीत ३९ रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णांची संख्या २९१ वर गेली असून, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या आठ झाली. जिल्ह्यात सध्या ४०२ रुग्णांची नोंद केली आहे. यापैकी १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित २१८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच केडीएमसीत रुग्ण संख्या ५६ तर दोघांच्या मृत्यूनंतर आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबई ३३, मीरा-भाईंदर सहा, ठाणे ग्रामीण चार, बदलापूर आठ, अंबरनाथमध्ये एक रुग्ण आढळला आहे.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे सण, उत्सवाच्या काळात वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीतीचे सावट निर्माण झाले आहे. १७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३५० होती. जिल्ह्यात मागील तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत ५२ ने वाढ झाल्याने रुग्णांची संख्या ४०२ झाली. स्वाइन फ्लूने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पाचने वाढ झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, कोरोनासह स्वाइन फ्लूचा मुकाबला करावा लागणार आहे.
Swine Flu Nashik Thane 16 Death 466 Active Patients
Health Maharashtra Cities Festive Season