शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अंतिम इशारा! ST कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारने उचलले हे पाऊल

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 11:25 am
in मुख्य बातमी
0
st strike1

मुंबई – दिवाळी सणातच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अद्यापही कायम आहे. सुमारे दहा-बारा दिवस उलटले तरी अद्यापही या संपावर तोडगा निघालेला नाही. परिणामी राज्यभरात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तर दुसरीकडे कामावर परत या, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार करताना दिसत आहेत. आता हा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला आहे.

राज्यभरात एसटीचे सुमारे एक हजार पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. आता उर्वरित सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी येत्या २४ तासात कामावर यावे. अन्यथा त्यांना सेवामुक्त करण्यात येईल, असा गंभीर इशाराच सरकारने दिला आहे. परंतु अद्यापही सुमारे एसटी महामंडळाचे सुमारे ९७ हजार कर्मचारी संपावर आहेत. कंत्राटी कर्मचाऱअयांच्या माध्यमातून एसटीची सेवा सुरू करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे आणि त्वरीत वेतन वाढ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात दोन्ही बाजूच्या शिष्टमंडळांनी आपापली बाजू लावून धरल्याने मुंबई उच्च न्यायालयात यावर तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, हायकोर्टानं संपकरी संघटनांना राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीला हजर राहून आपली भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तर कामगार संघटनांनी या समितीवर आपला विश्वास नसून निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची भुमिका हायकोर्टात व्यक्त केली आहे.

या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, एसटी महामंडळामध्ये सध्याच्या सुमारे १४०० रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांनी कामावर यावे, अशी आमची अपेक्षा आहे, परंतु तेही अद्याप संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवणार आहोत. २४ तासांत ते कामावर येतात की नाही पाहिले जाईल. अन्यथा, पुढे काय कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाईल.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सुमारे चार दिवसापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे, तसेच त्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन देखील दिले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसापुर्वी नाशिक दौऱ्यावर असताना म्हणाले की, सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती गंभीर आहे. एस टीचा संप सुरू आहे, त्यामुळे मागण्या योग्य असतील तरच सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करा तसेच मागण्यांमागची भावना समजून घ्यावी. त्याच वेळी मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, असे आवाहन पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

रोजंदारीवर काम करणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कामगारांनी २४ तासांत कामावर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असे या म्हटले आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने आतापर्यंत २ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. १६) एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. मंगळवारी विविध आगारातून संध्याकाळी सहापर्यंत सुमारे ७० बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या.

एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील नेमणूकीचे सुमारे दोन हजार कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवला. त्यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी आझाद मैदानात आंदोलकांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर दुसरीकडे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चांगलेच फावले आहे. प्रवाशांची अडवणूक करीत त्यांच्याकडून दुप्पट भाडे वसूल करण्याची जणू मोहीमच या खासगी वाहन चालकांनी सुरू केलेली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- जिल्ह्यातील १५ पैकी तब्बल १० तालुके कोरोनामुक्त

Next Post

…जेव्हा सचिन तेंडुलकर प्रत्यक्ष आदिवासी गावात अचानक प्रकटतो!

Next Post
FEUZ6gOXwAkBA B

...जेव्हा सचिन तेंडुलकर प्रत्यक्ष आदिवासी गावात अचानक प्रकटतो!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011