पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पाच वाजता निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना न्युमोनिया झाला होता. त्यांची प्रकृती खालावत होती. अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांचे पार्थिव आता पार्वती येथील निवासस्थानी नेले जात आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा मोठी आहे. राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखनही त्यांनी केले आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. त्यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे असे होते. त्यांनी तब्बल ७ दशके संशोधन आणि अभ्यासाचे कार्य केले.
हॉस्पिटलने काढलेले बुलेटिन असे