नाशिक – आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाली. या समितीच्या निधी वाटपावरुन यापूर्वीच कांदे यांनी उच्च न्यायालाचा दरवाजा ठोठावला आहे. तसेच, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी अनेक आरोप केले आहेत. आजच्या बैठकीत निधीच्या प्रश्नावरुन कांदे आक्रमक झाले. नांदगाव मतदारसंघाला निधी मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, काही प्रस्ताव हे अवैधरित्या मंजूर करण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. बैठकीनंतर कांदे यांनी माध्यमांशी संवाद साधून सर्व माहिती दिली आहे. बघा, ते काय म्हणत आहेत
https://www.facebook.com/103446941470343/posts/371465974668437/