India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी मांडली ही भूमिका

India Darpan by India Darpan
November 19, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत जोडो यात्रेमध्ये हिंगोलीतील सभेत बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद सुरू आहे. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. काँग्रेसच्या विरोधात त्यांनी ब्रिटिशांना मदत केली होती. तसेच, त्यांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली होती, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यात भाजप, शिंदे गट आणि मनसेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.

आपल्या पक्षाला सावरकरांबद्दल नितांत आदर असून, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे आपण समर्थन करत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यवर आदित्य ठाकरेंनी देखील भूमिका मांडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आमच्या मनात प्रचंड आदर व प्रेमाची भावना होती. राहुल गांधींच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आणखी सांगितले की, भाजपने याबाबत राजकारण करू नये. सावरकरांना केंद्र सरकारने अद्याप भारतरत्न का दिला नाही? असा टोला देखील लगावला. सध्या महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरू असून यात भाजप आणि मित्र पक्ष सोडून सर्वच पक्षीय नेते सहभागी होत आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेही राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते. सहाजिकच भाजपाकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले जात होते. यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.

या सर्व वादावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता आदित्य ठाकरेंनी आजच्या स्थितीवरही भाष्य करण्याचे आवाहन राजकीय पक्षांना केले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी याबाबतीत भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांच्या भूमिकेशी मीही सहमत आहे. पण सध्याच्या स्थितीसाठीही राष्ट्रीय पक्षांनी भांडायला पाहिजे, असेही ते म्हणाले. आपण सगळे ५० वर्षांपूर्वी किंवा १०० वर्षांपूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होते, यावर भांडायला लागलो, तर भविष्यासाठी कोण भांडणार आणि आत्ताच्या स्थितीसाठी कोण भांडणार? असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे यांची पत्रकार परिषद | शिवसेना भवन – LIVE https://t.co/0DG9ZnueOa

— ShivSena – शिवसेना (@ShivSena) November 18, 2022

Shivsena Aditya Thackeray on Rahul Gandhi Statement
Politics Svatantryavir Savarkar


Previous Post

सूरत-चेन्नई महामार्ग प्रकल्पाला सोलापूरमध्ये गती; महसूलमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

Next Post

कारागृहात गेल्याचा आरोग्यावर काय परिणाम झाला? खासदार संजय राऊत म्हणाले…

Next Post

कारागृहात गेल्याचा आरोग्यावर काय परिणाम झाला? खासदार संजय राऊत म्हणाले...

ताज्या बातम्या

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group