नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरातील कोट्यवधी नागरिक मोफत सरकारी रेशनचा लाभ घेत आहेत. पण आता केंद्र सरकाराने खोट्या मार्गाने फायदा घेणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन तब्बल १० लाख बनावट रेशनकार्डाचा रद्द करून या रेशनवर बंदी घातली आहे. परंतु त्याच बरोबर गोरगरिबांना रेशन कार्ड द्वारे मोफत धान्य वाटपाचा उपक्रम सुरूच आहे. त्याचप्रमाणे गहू तांदूळ बरोबरच आता तेल मीठ आणि हरभरा देखील देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे गोरगरीब रेशन कार्डधारकांना या योजनेचा निश्चितच लाभ होणार आहे.
सध्या रेशनकार्डधारकांना २१ किलो गहू आणि १४ किलो तांदूळ मोफत देण्याची सुरु आहे. मोफत रेशनसोबतच तेल आणि मीठाची पाकिटेही मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सध्या देशभरात ८० कोटीहून अधिक लोक मोफत रेशनकार्डाचा लाभ घेत आहे. केंद्र सरकारने शिधा वाटप विक्रेत्यांना अपात्र रेशनकार्ड धारकांची यादी पाठवण्याचे आदेश दिले आहे. अपात्र रेशनकार्डावर विक्रेते चिन्ह अंकित करून अहवाल जिल्हा मुख्यालय कार्यालयात पाठवतील. त्यानंतर त्यांचे रेशनकार्ड रद्द केले जातील.त्यांना मोफत रेशन सुविधा मिळणार नाही.
अंत्योदय रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदूळ मिळून ३५ किलो देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सामान्य रेशन कार्डधारकांना फक्त २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळेल. केंद्र सरकार देशभरातील रेशन कार्डधारकांना अनेक सुविधा देत असून ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत कोट्यवधी लोकांना सरकारने मोफत रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लोकांना त्याचा लाभ दिला जात आहे.
मीठ, तेल, हरभरा यांची पाकिटे शिल्लक असतील तर शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हा नियम पाळला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. म्हणजे जो पहिला येईल त्याला तेल आणि मीठ फुकट मिळेल आणि तेल आणि मीठ संपल्यावर मिळणार नाही. तसेच अपात्र कार्डधारकांचा डाटा डीलर्सना पाठवला जात आहे, जेणेकरून या नागरिकांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून रेशन वसूल करता येईल, असा निर्णय सरकारने जाहीर केला.
Ration Card Holder Benefits Wheat Rice Oil Salt