मुंबई – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. पुढील ४ दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. तसेच, येते काही दिवस राज्यामध्ये जोरदार वारेही वाहणार आहेत. पुढील दोन दिवस पाऊस आणि वाऱ्याची तीव्रता अधिक राहणार आहे. मात्र, सोमवारपासून याची तीव्रता कमी होणार आहे. अवकाळी स्वरुपाचा हा पाऊस असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. वीजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने आगामी ४ दिवसांचा वर्तविलेला जिल्हानिहाय अंदाज असा