नागपूर – कोणतेही व्यसन वाईटच असून व्यसनी व्यक्तींचा त्रास सर्वांनाच होतो. तंबाखू -पान आणि गुटखा खाल्ल्यानंतर रेल्वे स्टेशन आवारात भटकंती करताना भुंकणाऱ्या तसेच रेल्वे प्रवासातील पिंक बहाद्दर तथा पिचकारी मारू व्यसनींचा मोठा त्रास वाढला आहे. त्यामुळे घाणेरड्या पिचकाऱ्यानीं भरलेले कोपरे स्वच्छता मोहीम व थुंकीचे निर्मूलन करण्यासाठी रेल्वेला दरवर्षी १२०० कोटी रुपये खर्च करावे लागतात.
यात आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवाशांची ही वाईट सवय थांबवण्यासाठी रेल्वे जाहिरातींवरही प्रचंड खर्च करते. जाहिरातींद्वारे इकडे तिकडे थुंकू नये असे रेल्वे प्रवाशांना आवाहन करण्यात येते. मात्र असे असूनही परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही. यामुळेच थुंकीचे डाग काढण्यासाठी रेल्वेला वर्षाला १२०० कोटी खर्च करावे लागत आहेत. यामुळे रेल्वेच्या पाणी वापराचाही खर्च वाढतो. रेल्वे परिसरात अशा प्रकारची घाण पसरवण्यासाठी ५०० रुपये दंड आकारला जातो.
भारतीय रेल्वे आता या समस्येला तोंड देण्यासाठी नवीन योजनेवर काम करत आहे. याकरिता पश्चिम, उत्तर आणि मध्य या तीन रेल्वे झोनने स्टार्टअप एझीस्पिटला कंत्राटे दिली आहेत. या कंपनीच्या माध्यमातून प्रवासी बायोडिग्रेडेबल पाउचसह स्पिटून पाउच खरेदी करू शकतील. तंबाखू आणि पाउच व्यसनी व्यक्ती खिशातही ठेवू शकतील. वेगवेगळ्या आकाराचे हे पाउच प्रवासी एकापेक्षा जास्त वेळा वापरू शकता. हा पाउच अशा प्रकारे बनवला गेला की त्यात थुंकी घट्ट होईल. रेल्वे स्टेशन परिसरात आणि रेल्वेत घाण पडण्याची किंवा पसरण्याची कोणतीही अडचण होणार नाही. हा पाउच पर्यावरणपूरक असेल. त्याच वेळी, प्रवाशांकडून या पाउचचा वापर करून, रेल्वे परिसर किंवा रेल्वेमध्येही स्वच्छता राखली जाईल.