मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बंड फसले असते तर एकनाथ शिंदे स्वीकारणार होते हा पर्याय… वर्षभरानंतर झाले उघड…

by India Darpan
जून 21, 2023 | 1:07 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
eknath shinde e1655791206878

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्षभरापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना फोडले होते. पक्षातील कारभारामुळे त्रस्त झालेल्या आमदारांनी स्वत:च्याच पक्षाविरुद्ध उठाव केला होता. त्या घटनेला वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी हा उठाव अपयशी झाला नसता तर शिंदे यांनी स्वत:ला गोळी झाडून घेत आत्महत्या केली असती, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

भाजप सोबतच्या सरकार स्थापनेला येत्या ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी शिंदे गटावर टीका करत गद्दार दिवस पाळला आहे. तर शिंदे गट वर्षभरात केलेल्या कामांचे पोवाडे गात आहे. अशातच अत्यंत संयमी वक्तव्य करणाऱ्या दीपक केसरकरांनी उठावासंदर्भात सनसनीखेज वक्तव्य केले आहे. ‘अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केले. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर एकनाथ शिंदेंना वाटले, ही सर्व लोक माझ्याबरोबर प्रेमाने आली आहे. कारण, शिंदेंचा अपमान झाला, तो दिवस वर्धापनदिनाचा होता. वर्धापनदिनादिवशीच एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान का केला? याचे उत्तर दिले पाहिजे. एकनाथ शिंदे रागवून गेले असते, तर परत येण्याची तयारीही दाखवली होती,’ असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

अशी पडली खिंडार
मराठी माणूस, मुंबई आणि हिंदूंचा श्वास असलेल्या शिवसेनेत कधी नव्हे इतके मोठे खिंडार वर्षभरापूर्वी पडले. एकनाथ शिंदे यांनी स्वत:सोबत चाळीसहून अधिक आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुरत, गुवाहाटी असा प्रवास झाला. चर्चा, वाटाघाटी झाल्या. सुमारे दहा दिवस चाललेल्या या घडमोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आंतरराष्ट्रीय योग दिनी नऊवारीमध्ये योग प्रात्यक्षिके; गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजन

Next Post

बालिकेचे लैंगिक शोषण करणाऱ्याला नाशिक कोर्टाने दिली ही शिक्षा

Next Post
court 1

बालिकेचे लैंगिक शोषण करणाऱ्याला नाशिक कोर्टाने दिली ही शिक्षा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011