मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेते किंवा अभिनेत्री यांनी राजकारणात प्रवेश करणं काही नवं नाही. राजकारण आणि अभिनय दोन्ही उत्तमपणे सांभाळणाऱ्या सेलिब्रिटींची यादी मोठी आहे. पण आता मुरलेले राजकारणी अभिनय करताना दिसले तर नवल वाटायला नको. मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत. ‘राष्ट्र – एक रणभूमी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आलाय. या राजकारण आणि सत्ता असं कथानक असलेला हा चित्रपट आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शेतकरी नेते राजू शेट्टी दोन्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध नावे आहेत. आत हे दोघेही राजकारणातून थेट चित्रपटात एन्ट्री करणार आहेत. रामदास आठवले आणि राजू शेट्टींची जोडीच्या अभियनाची झलक मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘राष्ट्र – एक रणभूमी’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दोघेही अभियन क्षेत्रातही दिसणार आहेत. या चित्रपटात दोघांची विशेष भूमिका पहायला मिळणार आहे.
‘राष्ट्र-एक रणभूमी’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी रिलीज होणार होता. परंतु करोनामुळे ते शक्य झालं नाही. अखेर दोन वर्षांनी या चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे. प्रत्येक चित्रपटाची खासियत ह्ये त्यातले कलाकार असतात. या चित्रपटाचे वैशिष्ट्य काहीसे वेगळे आहे. या चित्रपटातील कलाकार महत्त्वाचे आणि दिग्गज आहेत शिवाय दोन मोठे राजकारणी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत.
(व्हिडिओ ट्रेलर सौजन्य – इंदर इटरनॅशनल)
आयपीआय नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी या दोन दिग्गजांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.या चित्रपटात फक्त राजू शेट्टी आणि रामदास आठवले नाहीत तर नामवंत कलाकार आहेत. त्यात विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, संजय नार्वेकर, गणेश यादव, रीमा लागू सारख्या बड्या कलाकारांची मोठी फौज आहे.
भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. सध्या ते राज्यसभेवर निवडून आले असून केंद्रात मंत्री आहेत. तसेच आज पर्यंत आठवलेंचे राजकीय करिअर पाहिल्यास त्यांची एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे त्यांच्या शीघ्र कविता. त्यांच्या कवितांवरती तुम्ही अनेकदा फिदा झाला असाल. सध्या रामदास आठवले हे भाजपसोबत सत्तेत बसलेला असून त्या काँग्रेसवर वेळोवेळी तोफा डागत असतात तसेच आपल्या कवितांमधून विरोधकांना घायाळ करत असतात त्यांच्या कविता विरोधकांसाठी बोचरे बाण असतात.
राजू शेट्टी हे गेली अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते म्हणून लोकप्रिय आहेत. जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या राजू शेट्टी यांनी खासदारकीची निवडणूक जिंकण्यापर्यंत मजल मारली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून निवडून आले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांना आज पर्यंत अनेक शेतकरी आंदोलनात पाहिला असेल. रस्त्यावरचे आंदोलन ते संसदेपर्यंत असं राजू शेट्टींचं राजकीय करियर राहिलेलं आहे. ते अनेक अनेक वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात, मात्र राजू शेट्टी एका वेगळ्याच भूमिकेत दिसून येणार आहेत.
‘राष्ट्र-एक रणभूमी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. महामारीमुळे लांबणीवर गेलेला महत्त्वपूर्ण विषय आता या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेला आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आलेले हे 26 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रत्येक सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
Politician Ramdas Athawale Raju Shetty in a Marathi Movie
Entertainment Politics Film Rashtra Ek Nirman Cinema