पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील पाचोरे फाटा शिवारात चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने मारुती कार पलटी होऊन अपघात झाला. अपघातात तारकेश अनिल दीक्षित वय ३५ रा. श्रीश्री रवी शंकर मार्ग नाशिक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर वाहनातील अन्य दोघे किरकोळ जखमी असून पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर पाचोरे फाटा शिवारात धुळ्याकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या मारुती कार क्रमांक एम एच ०२ सी पी २९९६ ही भरगाव वेगात असल्याने चालकांचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने कार जोरदार पलटी झाली.वाहनातील तारकेश अनिल दीक्षित वय ३५,रा. श्री श्री रवी शंकर मार्ग नाशिक. याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर वाहनातील अरविंद मनोहर जोशी वय ६०, आशा अरविंद जोशी वय ५५ आदी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह अधिक तपास करत आहे.