मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री महोदयांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.
मंत्रालयीन प्रशासकीय सेवांचे बोधचिन्ह आणि ‘जनहिताय सर्वदा’ घोषवाक्य हे त्या सेवेतील सदस्यांना प्रेरणा देण्याचे आणि कार्याप्रति निष्ठा निर्माण करण्याचे कार्य करीत असते म्हणून आता मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागाकडून निर्गमित होणाऱ्या पत्रांवर महाराष्ट्र प्रशासनाच्या परंपरेस साजेसे, असे बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार आहे.
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर मुद्रित होणाऱ्या #बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ या #घोषवाक्य यांचे अनावरण मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis उपस्थित होते. pic.twitter.com/8bdcK1f8Ol
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 10, 2023
New Logo and Slogan for Mantralay Letters
Maharashtra Governmnet