नाशिक – सरकार पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिष नाही. पण, निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की एक महिना झाला राज्याला मंत्री नाहीत. मंत्रीमंडळ विस्ताराला इतका विलंब योग्य नाही. राज्यात पूरपरिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्री मंडळ टीम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचे नेते लोक संकटात आहे, तिकडे भेटी देताय यातून मुख्यमंत्री यांनी बोध घ्यावा असा चिमटाही त्यांनी काढला. स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकरी भेटी घ्यायच्या हा विरोधात भास तुम्हीच बघत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा दौ-यावर पवार आले असता त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी पवार यांनी न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक असल्याचेही सांगितले. या निर्णयामुळे मोठा वर्ग नाराज होईल, हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयावरही त्यांनी सांगितले की, जे प्रकल्प आमच्या सरकारने मंजूर केले, टेंडर निघाले त्याला विलंब करणे किंवा रद्द करणे योग्य नाही. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज संस्थेच्या आघाडीबाबत बोलतांना सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करायची की नाही हे नंतर बघू आगोदर ओबीसी बाबत निर्णय होऊ द्या. आमच्या घटक पक्षानी एकत्र निवडणूक लढवावी अशी तरी सद्या आमची भूमिका आहे. यावेळी त्यांनी मालेगाव जिल्हा निर्मितीच्या हालचालीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मालेगाव जिल्हा निर्मिती बाबत निर्णय घेतल्यावर बघू.