नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील तीन ठिकाणचे अतिक्रम आज काढले. यात सातपूर विभागीय कार्यालय हद्दीमधील अतिक्रमाणाच समावेश होता. सातपूर कॉलनी जॉगिंग ट्रॅक लगत असलेल्या ४ ते ५ झोपडयांची अतिक्रमणे मनपामार्फत हटविण्यात आली. आनंदवल्ली येथील हजरत पीर सय्यद रांजेशा दर्गा लगतच्या रस्त्यावरील ३ ते ४ शेडची अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. शिवाजी नगर, पिंपळगांव बहुला येथील गॅरेजचे अनधिकृत बांधकाम संबंधीतांनी स्वतːहून काढून घेतले. सदर कारवाईच्या वेळेस नितीन नेर (सहा.आयुक्त तथा विभागीय अधिकारी, सातपूर), शिवाजी काळे (अधिक्षक, अतिक्रमण विभाग), सुभाष भामरे (अभियंता, न.नियोजन) अतिक्रमण विभागाची 3 पथके व दैनंदीन अतिक्रमण निमुर्लन पोलीस बंदोबस्त उपस्थित होता.
कडक कारवाई सुरुच राहणार
यापूढेही शहरातील बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पार्कींगच्या जागांवर असलेली बेकायदेशीर व अतिक्रमीत असलेली बांधकामे काढुन घेणेबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहीर आवाहनाव्दारे सूचना दिलेल्या आहेत. ज्या-ज्या नागरीकांनी, व्यावसायिकांनी, विक्रेत्यांनी त्यांचे अतिक्रमणे/अनधिकृत बांधकामे काढून घेतलेली नाही, त्यांचेविरुध्द कडक कारवाई करणेत येईल, तेव्हा ज्यांनी-ज्यांनी असे बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे केलेली आहेत. त्यांनी ती काढून घेऊन मनपास सहकार्य करावे असे आवाहनही मनपाने केले आहे.
गुन्हे देखील दाखल केले जातील
सहाही विभागांमध्ये ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इ. ठिकाणी अतिक्रमणे करुन व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांचेविरुध्द अशाच प्रकारची कडक कारवाई करुन प्रसंगी पोलीस विभागात गुन्हे देखील दाखल करणेत येतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपआयुक्त (अति.) यांनी केले आहे.